शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:50 IST

Pahalgam Terror Attack: राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय असलेल्या शक्ती सिंह यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून एक सनसनाटी आणि वादग्रस्त विधान केलं आहे. 

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट आली आहे. या दहशतवाद्यांना आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र दुसरीकडे पहलगाममधील हल्ल्यानंतर आता या मुद्यावरून  राजकारणही सुरू झालं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय असलेल्या शक्ती सिंह यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून एक सनसनाटी आणि वादग्रस्त विधान केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधीस सभेमधून दहशतवाद्यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना शक्ती सिंह यांनी हे विधान केलं आहे. पहलगामधील घटनेमधून कटकारस्थानाचा संशय येत आहे. असं वाटतं की, पहलगामची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती, असा दावा शक्ती सिंह यांनी केला. शक्ती सिंह यांच्या या विधानाविरोधात आता एनडीए आणि भाजपाच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तर आरजेडीचे नेते अब्दुल बारी सिद्धिकी म्हणाले की, काश्मीरमध्ये जे काही घडलं आहे ते दु:खद आहे. सरकारच्या कमकुवतपणामुळे हे घडले आहे. सरकार अपयशी ठरलं आहे. आम्ही याक्षणी राजकारण करह नाही आहोत. मात्र सरकारने याबाबत विचार केला पाहिजे.

दरम्यान, आरजेडीचे नेते शक्ती यादव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा प्रवक्ते अजय आलोक यांनी संतप्त प्रतिक्रिया केली आहे. ते म्हणाले की, शक्ती यादव जे काही बोलतात, त्याला तेजस्वी यादव यांची फूस असते. त्यामुळे शक्ती यादव हे तेजस्वी यादव यांच्या मनातीलच बोल बोलत आहेत. यावरून तेजस्वी यादव आणि शक्ती यादव यांचे विचार कसे आहेत हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोक व्यक्त करत असताना आरजेडीचे नेते अशी वादग्रस्त विधानं करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलIndiaभारत