शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:16 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर अजित डोभाल यांनी सुत्रे हाती घेतली आहेत.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधी आणखी बिघडले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानलाभारताकडून हल्ल्या होण्याची भीती सतावत आहे. ही भीती रास्त आहे, कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला, तेव्हाही भारताने तात्काळ पाकवर हवाई हल्ला केला होता. त्यामुळेच आता पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर आता एनएसए अजित डोभाल कामाला लागले आहेत.

अजित डोवाल एका नवीन रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत. 2014 मध्ये एका विद्यापीठात दिलेल्या भाषणादरम्यान अजित डोभाल यांनी पाकिस्तानविरुद्ध 'बचावात्मक हल्ल्याची' रणनीती स्पष्ट केली होती. त्यांचा असा विश्वास होता की, भारताचा आतापर्यंतचा दृष्टिकोन प्रामुख्याने बचावात्मक राहिला आहे, ज्यामध्ये आपण फक्त पाकिस्तानच्या कृतींना प्रत्युत्तर देतो. या रणनीतीमध्ये भारताला नेहमीच नुकसान सहन करावे लागते.

पाकिस्तानने 'मुंबई' केली, तर त्यांनी 'बलुचिस्तान' गमावण्यास तयार असले पाहिजे, असे डोभाल म्हणाले होते. त्यांचा संदेश असा होता की, भारताने आता केवळ बचावात्मक राहण्याऐवजी पाकिस्तानच्या अंतर्गत कमकुवतपणावर हल्ला करावा. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करणेदेखील समाविष्ट आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या माध्यमातूनही पाकिस्तानवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

आता कालच्या पहलगाम हल्ल्यानंतर डोभाल यांनी या रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला वेगळे करण्याची योजना आखल्याचे मानले जाते. असेही म्हटले जात आहे की, पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण यावेळी तिथले लोकही पाकिस्तानी सैन्यावर खूप संतापले आहेत. पाकिस्तानमध्ये सर्वत्र सरकारविरुद्ध खूप गदारोळ सुरू आहे. 

भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचा आवडता चीन देखील भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे, असे म्हणता येईल. आता डोभाल यांच्यासारखा अनुभवी अधिकारी पाकिस्तानला कडक संदेश देण्याची रणनिती आखत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भारत मोठी कारवाई करू शकते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAjit Dovalअजित डोवालJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान