शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 10:47 IST

भारत सरकारच्या या आदेशानंतर सर्वात जास्त चर्चा पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची होत आहे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर कायदेशीवर स्ट्राईक लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानविरोधात ५ मोठे निर्णय घेण्यात आलेत. त्यात भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द केला असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिलेत. जे व्हिसा धारक आहेत त्यांना १ मे पर्यंत पाकिस्तानात जाता येणार आहे.

भारत सरकारच्या या आदेशानंतर सर्वात जास्त चर्चा पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची होत आहे. सीमा हैदर भारतीय नागरिक सचिन मीणाच्या प्रेमात पडून पाकिस्तानसोडून भारतात आली होती. इथे तिने सचिनसोबत लग्न केले. आता भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात परतावं लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

नेपाळमार्गे भारतात आली होती 

सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली होती. सर्वात आधी ती पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानच्या शारजहातून नेपाळला पोहचली. नेपाळमध्ये काही दिवस घालवल्यानंतर काठमांडू टू दिल्ली बसमध्ये प्रवास करत ती चार मुलांसह भारतात पोहचली. याठिकाणी सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले तेव्हापासून सीमा हैदर भारतात राहत आहे. सीमा आणि सचिन यांची याआधी यूपी एटीएसने चौकशी केली आहे.

सीमाला परत जावं लागणार?

पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर सीमा हैदरलाही परत जावे लागणार का हे येणाऱ्या काळात कळेल. सीमा हैदर भारतात कुठल्याही व्हिसा आणि पासपोर्टशिवाय पोहचली होती. तिचे प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिक सचिन मीणासोबत लग्न केले आहे. जर यूपी सरकार या प्रकरणी सीमा हैदरविरोधात गुन्हा दाखल करून तिला विना व्हिसा, पासपोर्ट भारतात आल्याबद्दल शिक्षा होऊ शकते अथवा तिला पुन्हा पाकिस्तानात सोडले जाऊ शकते. सीमा हैदरने भारतीय नागरिकत्व मिळावे अशी मागणीही केली आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

दिल्ली हायकोर्टाचे वकील अबू बकर यांनी सांगितले की, सर्व पाकिस्तानी नागरिकांना कुठल्याही स्थितीत भारत सोडावा लागेल. त्यामुळे सीमा हैदरलाही भारतातून जावे लागेल. परंतु हे करणे सोपे नाही. सीमा हैदरला भारतात राहण्याची परवानगी द्यायची की नाही हे राज्य सरकारवर अवलंबून आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिकाशी लग्न केले आहे. सचिन मीणाशी लग्न करून तिला १ मुलगाही झाला आहे. त्यामुळे यूपी सरकारच्या रिपोर्टवर सीमा हैदरवर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होईल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला