शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 10:55 PM

गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ देत पाकिस्तानचा दावा

कराची: भारत पुन्हा एकदा हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानला सतावते आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हल्ल्याची भीती बोलून दाखवली. 16 ते 20 एप्रिल दरम्यान भारताकडून हल्ला केला जाईल, असा दावा कुरेशी यांनी केला. यावेळी त्यांनी गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ दिला. भारतानं पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक केला. तसाच हल्ला पुन्हा केला जाईल, अशी भीती कुरेशी यांनी व्यक्त केली. भारताकडून आणखी एका हल्ल्याची तयारी केली जात असल्याची विश्वसनीय माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे, असं कुरेशी यांनी पत्रकारांना सांगितलं. 16 ते 20 एप्रिल दरम्यान भारत पुन्हा एकदा हल्ला करेल, असंही ते पुढे म्हणाले. याबद्दलची अधिक माहिती पंतप्रधान इम्रान खान देशाला देण्यास तयार आहेत, असं कुरेशी यांनी सांगितलं. आम्ही याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला मेल केला. मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही, असं ते म्हणाले. भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला धडाकेबाज कारवाई करत बालाकोटवर बॉम्ब टाकले. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्याचा मोठा धसका पाकिस्ताननं घेतला. हल्ल्याला जवळपास दीड महिना उलटूनही पाकिस्ताननं हवाई मार्ग पूर्णपणे खुला केलेला नाही. एअर स्ट्राइकनंतर पाकिस्ताननं तातडीनं हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. अद्यापही पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील वाहतूक पूर्णपणे सुरू झालेली नाही. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्ताननं पाश्चिमात्य देशांकडे जाणारा एक हवाई मार्ग सुरू केला. मात्र अजूनही पाकिस्ताननं दहा मार्ग बंदच ठेवले आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकImran Khanइम्रान खानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला