शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 7:06 PM

Jammu-Kashmir Elections : पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

Jammu-Kashmir Elections : श्रीनगर :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रामगडमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी खोऱ्यातील जनतेला मोठे आश्वासन दिले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पाकव्याप्त काश्मीर (पीओके) जम्मू-काश्मीरचा भाग होणार आहे. यामुळेच पाकिस्तानात खळबळ उडाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

एका बाजूला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची टंचाई आहे, साहजिकच गरीब पाकिस्तान आज स्वत:ला सांभाळू शकत नाही. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर त्यातून वेगळे होण्यासाठी आवाज उठवत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक म्हणत आहेत की, आम्हालाही जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार आहे. तर आमची केमिस्ट्री पाकिस्तानशी जुळत नाही, असे बलुचिस्तान सांगत आहे. कारण पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

जाहीर सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे की जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र ध्वज देण्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सने जे म्हटले आहे, त्याचे ते समर्थन करतात का? कलम ३७० आणि ३५ ए परत आणण्याच्या आणि जम्मू-काश्मीरला अशांतता आणि दहशतवादाच्या युगात ढकलण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मागणीला राहुल गांधी समर्थन देतात का? काश्मीरमधील तरुणांच्या किंमतीवर पाकिस्तानशी बोलून पुन्हा फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचे काँग्रेस समर्थन करते का? असे सवाल करत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधलादुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, "आम्हाला भाजपकडून आणखी काही अपेक्षा नाही. नॅशनल कॉन्फरन्स हा असा पक्ष आहे, ज्याने गेल्या ३५ वर्षात हजारो बलिदान दिले आहे. जर आम्हाला पाकिस्तानच्या अजेंड्यानुसार जायचे होते, तर आम्ही ३५ वर्षांपूर्वी गेलो असतो, तर कदाचित आपल्या ४५०० हून अधिक साथीदारांचा बळी गेला नसता. जर अमित शाहांना नॅशनल कॉन्फरन्सच्या त्या बलिदानाकडे दुर्लक्ष करायचे असते, तर आम्ही काय करू शकतो?"

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा