शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पाक नरमला...! शांततेची संधी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 5:30 AM

वाढला आंतरराष्ट्रीय दबाव; कडक कारवाईसाठी दिला सज्जड दम

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याच्या कारस्थानाचे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली आतापर्यंतची ‘भारताला जशास तसे उत्तर दिले जाईल’ ही भूमिका बाजूला सारून, दोन्ही देशांनी शांततेसाठी प्रयत्न करू, असे मवाळ धोरण स्वीकारले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही बाजूंनी शांततेचे आवाहन करतानाच, त्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे दिल्यास आपण नक्की कारवाई करू, असे आश्वासनही दिले आहे.

आतापर्यंत पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही, असाच दावा इम्रान खान करीत आले. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या हल्ल्याचा फायदा करून घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी केली होती. आता मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळेच इम्रान खान यांनी शांततेची भाषा सुरू केली आहे. भारताने हल्ला करू नये, यासाठीच इम्रान खान यांनी शांततेची भाषा सुरू केल्याचे दिसत आहे.

त्यातच पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तान बेचिराख करेल. तसे होऊ द्यायचे नसेल, तर आपल्याला आधी ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील, असे सांगत, तशी पाकिस्तानची तयारी आहे का? असा सवाल पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी विचारला आहे.

अर्थात, आता अणुयुद्धाची शक्यता नाही, असे तेही म्हणाले असले, तरी पाकिस्तानची भीती त्यातून स्पष्टपणे दिसू लागली आहे. पुलवामा हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. दुसरीकडे अमेरिकेसह सर्वच देश पाकिस्तानवर (पान ९ वर)आरडीएक्स आणले कुठून याचा शोध सुरूपुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानातूनच आरडीएक्स आणले होते, असे एनआयएच्या तपासातून आढळून आले आहे. कोणत्या मार्गाने काश्मीरमध्ये ते आणले, याचा शोध सुरू आहे. ज्या कारमध्ये आरडीएक्स ठेवण्यात आले होते, त्या कारचा मालक सज्जाद भट्ट आहे, हेही एनआयएने शोधून काढले आहे. तो फरार आहे. मात्र, पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा हल्ल्यात थेट सहभाग होता आणि त्यांनीच सुसाइड बॉम्बर आदिल दार याचे माथे भडकावले होते व त्याच्याबरोबरच आणखी पाच ते सहा अतिरेकी या कटात सहभागी होते, असेही तपासात आढळून आले आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खान