शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

भारत-चीन युद्धाची खोटी बातमी प्रसारित करतंय पाकिस्तानी चॅनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 7:48 AM

पाकिस्तानी टीव्ही चॅनेल दुनया न्यूजनं असा दावा केला आहे की, चिनी सैनिकांकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात भारतीय लष्कराचे 158 सैनिक शहीद झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारत व चीनमध्ये सीमावाद व डोकलाम विवादावर तणावाची परिस्थिती सुरू आहे. भारत व चीन दोन्ही देश आपल्या दृष्टीकोनामध्ये बदल करण्यास तयार नाहीत. यादरम्यान पाकिस्तान उद्दामपणा केला आहे. पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनेल भारताविरोधात चुकीची माहिती पसरवत आहे.
 
पाकिस्तानी टीव्ही चॅनेल दुनया न्यूजनं असा दावा केला आहे की, चिनी सैनिकांकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात भारतीय लष्कराचे 158 सैनिक शहीद झाले आहेत. याशिवाय सोमवारी झालेल्या हल्ल्यात अन्य सैनिक जखमी झाल्याचीही खोटी बातमी या पाकिस्तानी चॅनेलनं प्रसारित केली. इतकंच नाही तर या पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं आपल्या वेबसाइटवर हल्ल्यासंदर्भातील फोटो पोस्ट करुन हद्दच पार केली. मात्र भारतीय लष्करानं फोटो बनावट असल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावले आहे.
 
पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं दावा केला आहे की, सिक्कीम मुद्यावरुन भारत व चीनमध्ये चकमक सुरू झाली आहे. ज्यानंतर चीननं भारतीय सैनिकांवर रॉकेट हल्ला केला. ज्यात भारतीय लष्करातील 150 जवान शहीद झाले असून अन्य जवान जखमी झाले आहेत.  या टीव्ही चॅनेलनं असाही कांगावा केला आहे की, विवादाची सुरुवात भारताकडून करण्यात आली होती. याला प्रत्युत्तर देताना चीननं भारतीय सैनिकांवर रॉकेट हल्ला केला. 
 
 
चिनी न्यूज चॅनेलचा हवाला
दुनया न्यूजनं दावा केला आहे की, या हल्ल्याचं दोन मिनिटांचं फुटेज चाइन सेंट्रल टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आलं होतं. चिनी सैनिकांनी रॉकेट लॉन्चर, मशिनगन व अन्य शस्त्रांचा वापर करुन भारतीय सैनिकांवर हल्ला केल्याचं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत व चीननं दोन मोठ्या व काही छोट्या भागांवर वर्चस्व असल्याचा आपआपला दावा करत आहेत,ज्यामुळे ही बाब गेल्या दशकांपासून दोघांमध्ये विवादाचा मुद्दा बनला आहे. 
 
दरम्यान, डोकलाममध्ये चीन सेन्यांकडून रस्ता बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,  ज्याला भारतानं विरोध करत रस्ता बांधण्यापासून चीनला रोखले होते.  या क्षेत्रावर चीन स्वतःचा दावा करत आला आहे.  तर दुसरीकडे भारत या क्षेत्राला भुतानचा भाग मानून भुतानच्या दाव्याचं समर्थन करत आला आहे.  भारतानं डोकलाम क्षेत्रातून मागे हटावं, अशी चीनचं म्हणणं आहे. मात्र अशा परिस्थितीत मागे हटण्यास भारत तयार नाही. या उलट भारतीय सैनिकांनी अधिक सैन्य तेथे तैनात केले आहे. 
 
फोटो आहेत बनावट - भारतीय लष्कर 
भारतीय लष्करानं हे फोटो बनावट असल्याचे सांगत म्हटले आहे की, हे फोटो अपघाताचे आहेत. हा अपघात अरुणाचल प्रदेशात सेनेच्या एका ट्रेनिंगदरम्यान झाला होता. या घटनेचे फोटो कित्येक महिन्यापूर्वींचे आहेत.