शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

पाकिस्तानी दहशतवाद्याची घुसखोरी 45 टक्क्यांनी झाली कमी- राजनाथ सिंह

By admin | Published: June 03, 2017 2:27 PM

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी 45 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 3- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिर खोऱ्यातील सुरक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. काश्मिर खोऱ्यातील सुरक्षेच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी 45 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण झाल्या निमित्त आयोजीत एका कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी कामाचा लेखाजोखा मांडला. 
 
भारतीय सैन्याने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. या सर्जिकल स्टाईकमध्ये एलओसीवरच्या दहशतवाद्यांच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. तसंच बऱ्याच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. 
"जम्मू आणि काश्मिरमधील सुरक्षा परिस्थिती सुधारली आहे. तसंच 2014 ते 2017 या तीन वर्षात तब्बल 368 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. 
 
जम्मू-काश्मिरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला मूळापासून संपवणार असल्याचंही या कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले आहेत. सरकारने दहशतवादाविरोधात चांगलं अभियान सुरू केलं आहे आणि देशात मुस्लिमांची संख्या जास्त असूनही आयसीस सारख्या संघटनांना भारतात मजबूत होऊ दिलं नाही, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.