शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाकिस्तानी तरुण भारतात आला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:03 IST

‘आमच्या भागात वाडवडिलांचं घर पाहणं, तिथं काही दिवस राहणं याला नशीब लागतं म्हणतात. मला माझ्या आईसाठी ते करायचं होतं!’

एहसान अहमद त्याचं नाव. तो मूळचा पाकिस्तानी; पण गत ७-८ वर्षांपासून अमेरिकेत वॉशिंग्टनला राहतो. लाहोरपासून २०० किलोमीटरवर सारगोधा त्याचं गाव. त्याच्या आईचा जन्म पाकिस्तानात झाला असला, तरी तिचे आई-बाबा म्हणजे एहसानचं आजोळ भारतातल्या भागवानचं. गुरदारपूरजवळचं. तिची इच्छा होती, आई-बाबांचं गाव पाहावं; पण ते झालं नाही. एहसान सांगतो, ‘आमच्या भागात वाडवडिलांचं घर पाहणं, तिथं काही दिवस राहणं याला नशीब लागतं म्हणतात. मला माझ्या आईसाठी ते करायचं होतं!’ तिला व्हिसा मिळाला नाही, पण एहसानला आठ दिवसांचा व्हिसा मिळाला. तो १२ मार्चला अटारी सीमेवरून भारतात आला. गावी गेला. तिथं बुजुर्गांना भेटला. आजोबांच्या आठवणी सांगितल्या. काही लोक त्यांना ओळखणारे भेटले. त्यांनी आगतस्वागत केलं. १९ मार्चला तो परत पोहोचला अटारीवर, तर त्याला सांगण्यात आलं की, देशाच्या सीमा बंद झाल्या असून, तुला जाता येणार नाही. त्याचा व्हिसाही संपत होता. त्यानं भारत सरकारला ट्विट करत अडचण सांगितली; पण २२ मार्चला जनता कर्फ्यु होता आणि पुढे देशभर लॉकडाऊन झालं. विदेशींना क्वारंटाईन करून गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं. तिथंच एहसानचीही सोय केली. दुश्मन मुल्ख म्हणून ज्या देशाविषयी माहिती मिळाली, तेथे तो क्वारंटाईन झाला होता. तो सांगतो, तिथं मलेशियन, जर्मन लोकही होते.एहसान सांगतो, ‘भारत सरकार आमची उत्तम काळजी घेत होतं. खायची व राहायची सोय होती; पण मन बेचैन होतं. ज्या देशात यायचे स्वप्न लहानपणापासून पाहिलं, व्हिसा मिळावा म्हणून प्रयत्न केले, व्हिसा मिळाला तेव्हा आठ दिवस का होईना म्हणत आलो, किती आनंद झाला होता! व त्याच देशात अडकून पडायची वेळ आली!’ १६ एप्रिलला त्याला सरकारने कळवलं की, अटारीहून तुमची जायची सोय केली आहे, तुम्ही जाऊ शकता! एहसान पाकिस्तानात परतला आहे!