शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

अतिरेकी हल्ल्यानंतर पाकची ‘शरीफ’गिरी!

By admin | Published: January 06, 2016 2:20 AM

अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे.

पठाणकोट : अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे. एअरबेसवर हल्ला करणारे सर्व सहा अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र आॅपरेशन अद्यापही संपलेले नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी जाहीर केले. विस्तीर्ण एअरबेसवर अभियान राबविणाऱ्या आणि मोठी हानी टाळणाऱ्या सुरक्षा दलांची पर्रीकर यांनी या वेळी प्रशंसा केली. मात्र याचवेळी काही ‘त्रुटी’ निश्चितपणे नडल्या, अशी प्रांजळ कबुलीही दिली. पंजाबच्या पठाणकोटमधील हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना पूर्वकल्पना होती, असा दावा भारतीय गुप्तचर संस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईचे आश्वासन दिले. त्याचवेळी अमेरिकेनेही पाकिस्तानला शब्द पाळण्याबाबत बजावले आहे. अतिरेकी हल्ला घडवून आणणाऱ्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला, त्यांची ओळख पटल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाच्या तपासात पाकिस्तानची मदत घेणार आहे, असे एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पठाणकोट हल्ल्याच्या कटकारस्थानाचा छडा लावणे हे मोठे आव्हान आहे. यात दीर्घ तपासाची गरज आहे. त्यामुळे मी अद्याप कुठलीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. पण हा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.काही त्रुटी नडल्या, हे मी मान्य करतो. परंतु सुरक्षेसोबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली गेली, असे मला अजिबात वाटत नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतीलच. सुरक्षेच्या प्रत्येक बाबीची तपशीलवार चर्चा होऊ शकत नाही. काही गोष्टी तपासासाठीही सोडा. - मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्रीआता धोरण कसे बदलले ? - काँग्रेस काँग्रेस आज सत्तेवर असती तर पाकवर हल्ले करीत जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी झाली असती. पठाणकोटवर हल्ल्यानंतरतसे काहीही होत नाहीय. टिष्ट्वटरवर शहिदांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्याचे एकमेव काम केले जात आहे, असा हल्ला काँग्रेसने केला.‘त्या’ जवानांना शहिदांचा दर्जाहल्ल्यादरम्यान प्राण गमावलेल्या सात सुरक्षा जवानांना शहिदाचा दर्जा मिळेल. युद्धात प्राण गमावलेल्यांना मिळणारे सर्व लाभ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळतील, असेही पर्रीकर यांनी सांगितले.२४ तासांत अहवाल द्यापोलीस अधीक्षकाच्या अपहरणानंतर घातपाताचे संकेत मिळूनही योग्य ती पावले का उचलली गेली नाहीत, याबाबत २४ तासांत स्पष्टीकरण द्या, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब पोलिसांना बजावले आहे.निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनपठाणकोट हल्ल्यानंतर भारत-पाक द्विपक्षीय चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. भारताने दिलेल्या ‘विशेष व कारवाईयोग्य’ पुरावे आणि माहितीच्या आधारावर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित पावले उचलावीत, यावर मोदींनी भर दिला.