शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
3
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
4
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
5
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
6
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
7
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
8
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
9
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
10
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
11
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
12
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
13
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
14
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
15
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
16
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
17
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
18
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
19
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
20
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?

पाकिस्तानचे ७ सैनिक ठार!

By admin | Published: November 15, 2016 6:25 AM

पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे ७ सैनिक मारले गेले असल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे ७ सैनिक मारले गेले असल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे. भिम्बेर सेक्टरमध्ये रविवारी रात्री ७ सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, विनाकारण गोळीबार करणाऱ्या पाकी जवानांना धडा शिकविण्यासाठी रविवारी रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी भारताने तोफगोळ्यांचाही तुफानी मारा केला आणि रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रही वापरले, असे कळते. मात्र भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा उलट्या बोंबा मारणे पाकने सुरू केले आहे. प्रत्यक्षात भारतीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवान आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले आहेत.

भारताचेही मोठे नुकसान?-पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमच्या सैनिकांनी भारतीय गोळीबाराला तोडीस तोड उत्तर दिले. त्यात भारतीय जवान निश्चितपणे मरण पावले आहेत. मात्र भारत ही माहिती लपवून ठेवत आहे.

उच्चायुक्तांना केले पाचारण-या घटनेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना पाचारण करून, भारतीय कृतीचा निषेध केला. याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही सचिव ऐझाज चौधरी यांनी बंबावाले  यांना दिला. पाकचे लष्करप्रमुख  राहील शरीफ यांनी आपल्या जवानांना भारताच्या गोळीबाराला जशास तसे  उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मृत जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रावळपिंडीला आलेल्या शरीफ यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले की, भारतीय सैन्याला अजिबात भीक घालू नका. देशाचे संरक्षण हे आपले पहिले कर्तव्य आहे. (वृत्तसंस्था)