शहरं
Join us  
Trending Stories
1
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
2
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
3
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
4
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
5
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
6
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
7
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
8
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
9
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
10
"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला
11
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
13
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
14
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
15
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
16
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
17
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
18
Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
19
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
20
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?

पाकचा 11 जवानांना मारल्याचा दावा खोटा - भारतीय लष्कर

By admin | Published: November 17, 2016 9:11 AM

14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे. भारतीय लष्कराने हा दावा फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताविरोधात अनेक खोटे दावे केले जात आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे, 14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा दावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे.
 
मात्र, भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळून लावले आहे. '14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच 14 नोव्हेंबर रोजी भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचा दावादेखील खोटा आहे', असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.  
 
काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातले. यासंदर्भात बोलताना, 'नियंत्रण रेषेजवळ भारताने केलेल्या गोळीबारात ज्या दिवशी पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले, त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने जवळपास 11 भारतीय जवानांना मारले', असा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी बुधवारी केला.  
 
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानने जवळपास 40-44 भारतीय सैनिकांना मारल्याचेही राहील शरीफ म्हणाले आहेत. मात्र भारतीय लष्कर ही बाब स्वीकारण्यास नकार देत असून झालेले नुकसान स्वीकारण्याची हिंमत भारताने दाखवावी, असा कांगावादेखील राहील यांनी केला आहे.  तसेच 'आक्रमक कारवाईतून काहीही निष्पन्न होणार नाही', असा संदेशदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.