शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा- भारत

By admin | Published: March 02, 2017 7:17 AM

भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत.

ऑनलाइन लोकमतजेनेव्हा, दि. 2 - भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करत असलेले भारतीय राजदूत अजित कुमार यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला असून, भारताविरोधात कुरघोडी करण्यासाठी दहशतवादी संघटनांना जन्म देतो आहे. त्यामागे भारतातली शांती भंग होऊन देशाचं विकासावरचं लक्ष्य हटवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तान सर्वाधिक खरतनाक दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना पोसतो आहे. पाकिस्तानमध्ये सद्य स्थितीत दहशतवाद्यांना निर्माण करणा-या संघटनांच्या म्होरक्याचाच हे दहशतवादी खात्मा करत आहेत. पाकिस्ताननं भारतासोबत काश्मीर मुद्द्यावर बोलण्याआधी पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडावा, त्यानंतरच चर्चेला यावं, असंही अजित कुमार म्हणाले आहेत. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन करत लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत आहे. तसेच पाकिस्ताननं लवकरात लवकर पाकव्याप्त काश्मीर खाली केलं पाहिजे. काश्मीरमध्ये उसळणा-या हिंसाचाराला सर्वस्वी सीमेपलीकडेचा दहशतवाद आणि पाकिस्तानचं जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पाकिस्तान निर्दयीपणे मानवाधिकारांचं उल्लंघन करत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान स्वतःच्या प्रांतातील बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वासह उत्तर पश्चिम भागातील लोकांवर संकोच न करता दहशतवादी कारवाया करत असून, हवाई हल्लेही करत आहे. स्वतःच्याच देशात धार्मिक आणि सांप्रदायिक दंगे घडवत असल्यानं पाकिस्तान या देशाचं रुपांतर आता जागतिक दहशतवादी देशामध्ये झालं आहे. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. पाकिस्ताननं 2016 या वर्षांत जवळपास 151 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, अशी माहिती त्यांनी संयुक्त राष्ट्रात दिली आहे.