शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भारताच्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 06:11 IST

जम्मू-काश्मिरमध्ये भिंबेर गली भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने गुरुवारी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले.

श्रीनगर/इस्लामाबाद : जम्मू-काश्मिरमध्ये भिंबेर गली भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने गुरुवारी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. पाकिस्ताननेही त्यांच्या दोन जवानांच्या मृत्यूस दुजोरा दिला. मात्र भारताकडून निष्कारण गोळीबार केल्याची आवई उठवली आहे. नौशेरा भागात पाकिस्तानच्या गोळीबारात एक भारतीय जखमी झाला आहे.पाकिस्तानने गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजल्यापासून गोळीबाराला सुरुवात केली. भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात मुनीर चोहान, आमीर हुसेन हे दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले. नियंत्रण रेषेच्या जवळ पुंछ जिल्ह्यातील मेंढार परिसरातल्याा बालकोट व मानकोट भागात भारत व पाकिस्तानचे सैनिक परस्परांवर गोळीबार तसेच तोफमारा करीत आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली असून रहिवाशांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. गोळीबारात भारतीय हद्दीत जीवित वा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेपलीकडून केलेल्या गोळीबारात गुरुवारी पुंछ जिल्ह्यातील मानकोट भागात दोन भारतीय जवान जखमी झाले. हे दोन्ही जवान महार रेजिमेंटचे आहेत. गेल्या १४ जानेवारीपासून राजौरी व पुंछ जिल्ह्यातीलनियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्याने सातत्याने गोळीबार चालविला आहे. त्यामुळे नौशेरा, आर. एस. पुरा,कठुआ येथील सीमालगतच्या गावातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्याआधी २२ फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाल्यानंतर उरी भागातील आठ गावांतील रहिवाशांनीही सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले होते. (वृत्तसंस्था)>चीनशी संघर्ष वाढणारनवी दिल्ली:चीनशी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्षाचे प्रसंग वाढीला लागण्याची शक्यता आहे, अशी भीती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती संवेदनशील बनली आहे. दोन्ही देशांतील सैन्यामध्ये संघर्षाचे प्रसंग निर्माण होत आहेत. एका बाजूला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु असून दुसºया बाजूस प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात येत आहे असे ते पुढे म्हणाले.लष्कर व सेंटर फॉर लॅन्ड वेल्फेअर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भामरे बोलत होते.

टॅग्स :Terrorismदहशतवाद