शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

हरयाणात साक्षर उमेदवारच लढवणार पंचायत निवडणूक

By admin | Published: December 10, 2015 12:10 PM

हरयाणामध्ये पंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असलाच पाहिजे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० -  ग्रामपंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार किमान दहावी पास असलाच पाहिजे यासाठी हरयाणा सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. पंचायत निवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ७ सप्टेंबरला हरयाणा सरकारने विधानसभेत एक कायदा मंजूर केला. त्यानुसार खुल्या वर्गातील उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला पाहिजे तर, महिला व दलित उमेदवार हा किमान ८ वी पास आणि दलित महिला पाचवी पास असली पाहिजे.

तसेच या कायद्यानुसार, उमेदवाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, वीज बिल, कर्जाचे हप्ते थकलेले नसावेत व सगळ्यात महत्वाचेे म्हणजे घरात शौचालय असले पाहिजे, अशा अटी या कायद्याद्वारे घालण्यात आल्या आहेत.

या कायद्यामुळे उमेदवाराच्या निवडणूक लढवण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते असा आक्षेप घेत ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोशिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती देत, हरयाणा सरकारला नोटीस बजावली होती.