शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आदिनाथ पंचकल्याणक महोत्सवाची सांगता; सोनगड येथे भगवान बाहुबलींवर महाअभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 17:49 IST

Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठ दिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: सोनगड येथील श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठ दिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. २६ जानेवारी २०२४ रोजी एका टेकडीवर लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या बाहुबली भगवान यांच्यावर महामस्तकाभिषेक करण्यात आला. गेल्या सात दिवसांपासून विविध विधींचे आयोजन करण्यात आले होते.

या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन सोनगडच्या श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टने केले असून, विश्वस्त नेमिषभाई शाह हे महोत्सवाचे मुख्य निमंत्रक होते. नेमिषभाई शाह यांच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मनसुख मांडवीय यांनी विशेष हजेरी लावली. या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात प्रतिष्ठाचार्य सुभाषभाई शेठ आणि बालब्रह्मचारी हेमंतभाई गांधी यांच्यासह त्यांचे सहकाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विधी केले. १९ जानेवारी रोजी या महोत्सवाची सुरुवात झाली होती. २६ जानेवारी रोजी आदिनाथ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाची सांगता महामस्तक अभिषेकाने झाली.

सर्व जिनबिंबांना मंदिरात विधीपूर्वक विराजमान करण्यात आले

या महोत्सवात मोक्षकल्याणकचा संपूर्ण विधी स्क्रीनवर थ्रीडीमध्ये दाखवण्यात आला. पंचकल्याणक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर सर्व जिनबिंबांना मंदिरात विधीपूर्वक विराजमान करण्यात आले. बाहुबली भगवान यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुफळ संपूर्ण झाला. तसेच जंबुद्वीपमध्ये १३० देवतांचे पूजन करून स्थापना करण्यात आली. हा सोहळा प्रचंड उत्साह, आनंद आणि पावित्र्याच्या वातावरण पूर्ण झाला. या विशेष सोहळ्याला भारत देशातून तसेच परदेशातील विविध ठिकाणांहून १५ ते २० हजार भाविक उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, पंचकल्याणक विधींमध्ये अनेक विधी करण्यात येतात. ज्यामुळे संसारी ते सिद्ध, अपवित्रतेकडून शुद्धता आणि अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे परमेश्वराचा प्रवास पूर्ण झाला, असे मानले जाते. जो प्रत्येक जीवासाठी आदर्श, मार्गदर्शक आणि सत्याचा प्रकाश आहे, योग्य जीव त्या अनुषंगाने आत्मसंवर्धन करून स्वतःचे कल्याण करतात, असे म्हटले जाते. 

टॅग्स :Gujaratगुजरात