शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

पांडवकालीन प्रथा की अन्य काही...! नवविवाहितेला नवऱ्याच्या दोन भावांसोबतही राहण्याची सक्ती; सासू म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:21 IST

एका नवविवाहितेला तिच्या सासुने तिन्ही मुलांसोबत राहण्यास भाग पाडले आहे. तसेच ती गर्भवती राहिल्याचे समजताच तिच्या पतीने ते मूल स्वीकारण्यास नकार देत जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले आहे. 

देशाच्या काही भागात आजही पांडवकालीन प्रथा सुरु आहे. एका भावाचे एका महिलेशी लग्न करून दिले जाते, तिच्यावर मात्र हक्क नवऱ्यासह सर्व भावांचा असतो. उत्तर प्रदेशमध्ये असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. एका नवविवाहितेला तिच्या सासुने तिन्ही मुलांसोबत राहण्यास भाग पाडले आहे. तसेच ती गर्भवती राहिल्याचे समजताच तिच्या पतीने ते मूल स्वीकारण्यास नकार देत जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले आहे. 

महिलांच्या अत्याचारात काही घट झालेली नाही. देशभरात ठिकाठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकताच एक प्रकार समोर आला आहे जो पांडवांची पत्नी द्रौपदीच्या कथेची आठवण करून देणारी आहे. या महिलेला केवळ हुंड्यासाठीच छळण्यात आले नाही तर तिचे शारिरीक शोषणही करण्यात आले आहे. नवऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवणे हे विवाहामध्ये सामान्य आहे, परंतू या महिलेला नवऱ्याच्या दोन भावांसोबतही शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले आहे. 

जेव्हा या नवविवाहितेने यास नकार दिला तेव्हा तुला काही आम्ही एका मुलासाठी लग्न करून आणलेले नाही, तिघांसोबतही रहावे लागेल, असे तिच्या सासूने सांगितले आणि तिला हे सर्व करण्यासाठी भाग पाडण्यात आले. तिचा उपभोग तिन्ही भावांनी घेतला. जेव्हा तिला समजले की ती प्रेग्नंट राहिली आहे, तेव्हा तिने आपल्या पतीला सांगितले. परंतू पतीने ते मूल स्वीकारण्यास नकार दिला. भावांना तिच्या शरीराचे सुख घेण्यास संमती देणाऱ्या पतीने ते मुल आपले नाही, असे सांगत तिला गर्भपात करण्यास सांगितले. यास तिने नकार दिला तेव्हा तिला औषध भरवून गर्भपात करवला गेला. 

पीडितेचे ६ मार्च २०२४ ला फतेहपूरमध्ये झाली होती. लग्नानंतर नवरा आणि दिरांनी तिच्याकडे कारची मागणी केली. तिच्या वडिलांनी असमर्थता दर्शविली. तेव्हा तिला शारिरीक त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेने न्यायालयात या अत्याचाराविरोधात दाद मागितली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. पती, सासू आणि दोन दिरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :marriageलग्न