शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

प. बंगाल, आसाममध्ये आज पहिला टप्पा

By admin | Published: April 04, 2016 2:48 AM

प. बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा

गुवाहाटी/ कोलकाता : प. बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा मुकाबला करावा लागत असताना आसाममध्ये काँग्रेसच्या तरुण गोगाई यांना सत्ता कायम राखणे कसोटीचे ठरणार आहे. प. बंगालमधील माओवादग्रस्त भागात मतदान होत असल्यामुळे चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.प. बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांमध्ये नवी सरकारे निवडली जाणार असून महिन्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. पहिल्या टप्प्यात प. बंगालमधील १८, तर आसाममधील ६५ मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. प. बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होत असले तरी ११ एप्रिल रोजीही पहिल्या टप्प्यातील काही मतदारसंघ समाविष्ट केले जाणार असल्यामुळे मतदानाच्या ७ तारखा राहतील. आसाममध्ये मतदान दोन टप्प्यांत होत आहे. (वृत्तसंस्था)> समीकरण बदलले....२०११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने युती केल्यामुळे डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता उलथविली गेली होती. त्यानंतर काँग्रेसने तृणमूलशी काडीमोड घेतला. आता काँग्रेस- डाव्या आघाडीने ममता बॅनर्जी यांच्यासमोर जबर आव्हान उभे केले आहे.> प. बंगालमध्ये सोमवारी प. मिदनापूर, पुरुलिया आणि बांकुरा या माओवादग्रस्त संवेदनशील भागात मतदान होत असून १३३ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. अप्पर आसाम, पर्वतीय जिल्हे, उत्तर आणि बराक खोऱ्यांमध्ये ४० हजारांवर सुरक्षा जवान तैनात आहेत. भाजप-आगप-बीपीएफच्या आघाडीने काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या असताना एआययूडीएफने वेगळी चूल ठेवल्यामुळे तिरंगी लढती रंगणार आहेत.निवडणूक आयोगाने १८ पैकी १३ मतदारसंघांमध्ये डाव्या दहशतवादाचा प्रभाव आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी ४ वाजताच मतदान आटोपले जाईल. पुरुलिया जिल्ह्याचा काही भाग, मनबाजार, काशीपूर, पारा आणि रघुनाथपूरमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालेल.