शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

आई-वडील गेले मुलींना घरी सोडून

By admin | Published: August 28, 2016 12:29 AM

मुलांना चार घास खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण घेत नाहीत ते असतात आईबाप. पण जे लहानग्या मुलांना वाऱ्यावर सोडून जातात, त्यांना म्हणावे तरी काय? ही कुठलीही

नवी दिल्ली : मुलांना चार घास खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण घेत नाहीत ते असतात आईबाप. पण जे लहानग्या मुलांना वाऱ्यावर सोडून जातात, त्यांना म्हणावे तरी काय? ही कुठलीही काल्पनिक कथा नाही, तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हे भीषण वास्तव आहे. दिल्लीबाहेरील समयपूर बादली या भागात गत आठवड्यात घडलेली ही घटना अंगावर काटा तर उभा करतेच; पण आई-वडिलांच्या ममतेवरही प्रश्नचिन्ह उभे करते. केवळ भुकेपोटी मरणाच्या दारातून परत आलेल्या या दोन मुलींची ही परिस्थिती हृदय हेलावून टाकणारी आहे. अलका (८) आणि ज्योती (३) या मुलींवर सध्या दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे वडील बबलू हे १५ आॅगस्ट रोजीच घर सोडून निघून गेले. ३५ वर्षीय बबलू यांना दारूचे व्यसन असून, ते बेरोजगार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी आईनेही पाच वर्षाच्या मुलासह घर सोडले. गेल्या आठवड्यात १९ आॅगस्ट रोजी नेपाळी कॉलनीतील रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस तिथे दाखल झाले. एका घराच्या कोंदट खोलीत प्रवेश करताच खाटेवर निपचित पडलेल्या त्या दोन लहान मुली दिसल्या. घरात प्रचंड दुर्गंधी. डासांचा वावर. पोलिसांनी या अर्धमेल्या मुलींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मुलींच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्याचे इन्फेक्शन होत होते. डॉक्टरांनीही चार दिवस प्रयत्नांची शिकस्त करीत या मुलींना अक्षरश: मृत्यूच्या तावडीतून सोडवून आणले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)- पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली आहे. या मुली पूर्ण बऱ्या होईपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश बालकल्याण समितीने दिले आहेत. त्यानंतर त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.