शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

G20 नंतर भारत आता P20 चे आयोजन करण्याच्या तयारीत, देशाची नवी संसद जगाला दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 13:52 IST

देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे. 

नवी दिल्ली : G20 शिखर परिषदेच्या मोठ्या यशानंतर आता P20 म्हणजेच पार्लमेंट-20 साठी दिल्लीत तयारी सुरू आहे. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत G20 शिखर परिषदेत सहभागी सर्व देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत येणारे खासदारांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे. 

एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या ध्येयांसह भारत P20 परिषदेत आपला शतकानुशतके जुना लोकशाही इतिहास जगासमोर मांडणार आहे. P20 शिखर परिषदेचा मुख्य कार्यक्रम 13-14 ऑक्टोबर आहे, परंतु 12 ऑक्टोबरपासून परिषद सुरू होईल. पहिल्या दिवशी पार्लमेंटरी फोरम ऑन लाईफ या थीमवर अनेक कार्यक्रम होणार आहेत. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांना अंतिम रूप दिले जात आहे. परिषदेत एकूण चार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

"Agenda 2030 for SDGs: Showcasing Achievements, Accelerating Progress" असे पहिल्या सत्राचे नाव आहे. हे 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकास लक्ष्यांवर आधारित आहे. यामध्ये कोरोना महामारीनंतर जागतिक स्तरावर गरिबी आणि मागासलेपणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बनवलेल्या धोरणांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. या सत्रात भारत आपल्या विविध लोककल्याणकारी योजना सर्व देशांसमोर रोल मॉडेल म्हणून मांडणार आहे. 

दुसरे सत्र "Sustainable Energy Transition: Gateways to a Green Future" या विषयावर आहे. हे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांद्वारे हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याबद्दल आहे. तसेच,  या सत्रादरम्यान विकसित देशांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल ज्याअंतर्गत अर्थसंकल्प आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसनशील देशांना मदत करण्याचे मान्य करण्यात आले.

याचबरोबर,"Mainstreaming Gender Equality: From Womens Empowerment to Women-Led Development" असे तिसऱ्या सत्राचे नाव आहे. या सत्रातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नव्या संसदेच्या सुरुवातीलाच महिला आरक्षण विधेयक मंजूर करून भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे. यानंतर चौथे आणि अंतिम सत्र "Transformation in Peoples Lives through Public Digital Platforms" या विषयावर आहे.

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारत