शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 7:05 PM

वक्फ सुधारणा विधेयकावरून देशात बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यातच आसामच्या जमीयत उलेमा ए हिंद संघटनेकडून मोठा दावा करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देशभरात चर्चा सुरू आहे. सध्या हे विधेयक संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे आहे. त्यातच आसामच्या जमीयत उलेमाचे प्रमुख नेते मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी मोठा दावा केला आहे. भारताची नवीन संसदेची इमारत वक्फ जमिनीवर बनली आहे असा दावा अजमल यांनी केला आहे. सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी या विधेयकाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीवर (JPC) बहिष्कार टाकला आहे. ५ कोटी लोकांनी जेपीसीला सूचना करत या विधेयकावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे या विधेयकाबाबत किती नाराजी आहे हे दिसून येते असं मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी म्हटलं आहे.

मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी घोषणा केली की, जमीयत उलेमा ए हिंद आसाममधील वक्फ बोर्डाच्या जमिनींचे सर्वेक्षण करेल जेणेकरून या विधेयकाला आव्हान देता येईल. नवीन संसदेची इमारत ही वक्फच्या जमिनीवर बनली आहे. वक्फ जमिनीची यादी पाहा, त्यात संसदेचाही उल्लेख आहे. वसंत विहारपासून एअरपोर्ट ते दिल्ली एअरपोर्टही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनले आहे. हा जुना रेकॉर्ड आहे. दक्षिण भारतात चंद्राबाबू नायडू यांच्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हायकोर्ट उभारलं आहे. त्याला कुणी परवानगी दिली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच वक्फच्या जमिनीवर कुणी काहीही करत आहे. ते अडचणीत येऊ शकतात. सरकार येत जात राहील. वक्फ बोर्डाच्या वादामुळे केंद्रातील सरकार जाईल, आमच्याकडे जुना भारताचा रिपोर्ट आहे, त्यात संसद वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे हे असेल. मी १५ वर्ष संसदेत होतो, संसदेची जमीन वक्फच्या जागेवर आहे अशी चर्चा होती, त्यामुळे यावर संशोधन व्हायला हवं, आम्हीही संशोधन करू. अनेक वर्ष चर्चा होती, परंतु त्यावर संशोधनाची गरज पडली नाही. आता वक्फ विधेयक आल्यामुळे याचं संशोधन करण्याची गरज आहे. संसदेपासून आसामपर्यंत वक्फच्या जितक्या जागा आहेत त्या मुस्लिमांना मिळायला हव्यात अशी मागणी मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केली.

दरम्यान, वक्फ १४०० वर्षापासून सुरू आहे, केवळ भारतात नाही तर जगभरात जमिनी आहेत. भारतातही हजारो वर्षापासून वक्फ प्रथा आहे. त्या हजारो वर्षात १२० वर्षापासून असलेली संसदेची इमारतही वक्फची जमीन असू शकते. वक्फ सुधारणा विधेयक आल्यामुळे या संशोधनाची गरज पडली. भाजपा सरकार वक्फच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करतंय. जेपीसी संपूर्ण भारतातील संपत्तीविषयी आढावा घेत आहेत. जेपीसीत विरोधी खासदार त्याग करत आहेत. आम्ही हा मुद्दा पुढे आणला आहे त्यावर रिसर्च करावं असं मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी सांगितले.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपा