शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

"ज्या योजनेची तुम्ही खिल्ली उडवलीत, आज त्याच योजनेत...", सोनिया गांधी 'मनरेगा'वरुन मोदी सरकारवर बरसल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:03 PM

Parliament News: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी सरकारनं मनरेगा योजनेताल कमकुवत केल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी सरकार 'मनरेगा'ला कमकुवत करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. "काही वर्षांपूर्वी 'मनरेगा'ची काही लोकांकडून खिल्ली उडवली गेली, कोविड-19 आणि लॉकडाऊनमध्ये कोट्यवधी गरीब कुटुंबांना वेळेत मदत केली आणि सरकारला वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका 'मनरेगा'नं बजावली. असं असतानाही 'मनरेगा'च्या बजेटमध्ये सातत्यानं कपात केली जात आहे", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेता केला.

"सध्या देशात वेळेवर पेमेंट आणि नोकऱ्यांची कायदेशीर हमी कमकुवत होत आहे. बेरोजगारी सातत्यानं वाढत आहे, तरीही २०२० च्या तुलनेत यंदा 'मनरेगा'चं बजेट ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पातील कपातीमुळे कामगारांच्या पगाराला विलंब होत आहे", असा आरोप सोनियांनी लोकसभेतील भाषणात केला. दुसरीकडे, गुरुवारी राज्यसभेत ७२ सदस्यांना निरोप देण्यात आला. राज्यसभेत १९ राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सदस्यांचा कार्यकाळ मार्च ते जुलै दरम्यान पूर्ण होत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये एके अँटनी, आनंद शर्मा, काँग्रेसच्या अंबिका सोनी, कपिल सिब्बल, भारतीय जनता पक्षाचे सुरेश प्रभू, सुब्रमण्यम स्वामी, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंग या मंत्र्यांचा देखील समावेश आहे. नामनिर्देशित सदस्य एमसी मेरी कोम, स्वपन दासगुप्ता आणि नरेंद्र जाधव यांचाही कार्यकाळ संपुष्टात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जावेत आणि देशाच्या भावी पिढीला प्रेरणा द्यावी, असं आवाहन केलं. निवृत्त होणाऱ्या सदस्यांकडे अनुभवाचा मोठा खजिना असतो आणि कधी कधी ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस