शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बुटाच्या तळव्यात लपवून आणली ‘स्मोक स्टिक’! वाढीव सोल बसवून तयार केली जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:22 IST

मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती.

नवी दिल्ली : लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी करून ‘स्मोक स्टिक’चा वापर करत धूर पसरवणाऱ्या दोन तरुणांनी आपल्या बुटाचा डावा तळवा कापून बनवलेल्या अतिरिक्त जागेत ती लपवून आणल्याचे दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती.

आरोपींवर दाखल गुन्ह्यानुसार, संसद भवनाच्या आत आणि बाहेर उघडलेल्या ‘स्मोक स्टिक’वर उघडताना गॉगल आणि हातमोजे वापरावेत, अशी इशारेवजा सूचना लिहिलेल्या होत्या.

सागर शर्माने त्याच्या राखाडी एलसीआर बुटाचा डावा सोल कापून अतिरिक्त रबर जोडले होते आणि त्यात जागा करण्यात आली होती. मनोरंजनच्या डाव्या बुटाच्या सोलमध्येही अशीच जागा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उजव्या बुटाचा तळही अर्धवट कापलेला आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संसद सुरक्षा भंग प्रकरणात आणखी दोन व्यक्तींची चौकशी केली असून, त्यापैकी एकाला राजस्थानमधून गुरुवारी रात्री उशिरा उचलण्यात आले. दरम्यान, बुधवारपासून फरारी असलेल्या मास्टरमाईंड झा याने गुरुवारी रात्री नवी दिल्ली जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. या आरोपींच्या ‘भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट करण्यात आले आहे.

ललितचा भाऊ म्हणतो, कुटुंब धक्क्यात

मुख्य सूत्रधार ललित मोहन झा याचा मोठा भाऊ शंभू झा यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, संपूर्ण कुटुंब अजूनही शॉकमध्ये आहे. तो या सगळ्यात कसा अडकला हे आम्हाला माहीत नाही. वादावादी, मारहाण यापासून तो नेहमीच दूर राहिला. लहानपणापासूनच तो शांत स्वभावाचा होता आणि कोणताही मिसळत नव्हता. तो खासगी शिक्षक असण्याव्यतिरिक्त, एका एनजीओशी संबंधित होता. त्याचे फोटो पाहून आम्हाला खरोखरच धक्का बसला.

चौघांचे मोबाइल नष्ट केल्याचा दावा

शिक्षक आणि एनजीओ सदस्य असलेल्या झा याने चौकशीत आरोपी सागर, मनोरंजन, नीलम आणि अमोल यांच्याकडून घेतलेले चार मोबाइल फोन नष्ट केल्याचा दावा केला आहे; परंतु, त्याची पडताळणी केली जात आहे.

हिंसक अराजकता चैतन्यशील लोकशाहीचे अपहरण करू शकत नाही. संवैधानिक अधिकारांची मजबुती आणि मूलभूत कर्तव्यांच्या मंत्राने भारताला अजेय लोकशाहीत रूपांतरित केले आहे. संवैधानिक सार्वभौमत्वाचे वर्चस्व यामुळे भारताला लोकशाहीची महाशक्ती बनविले आहे.

- मुख्तार अब्बास नक्वी,

माजी केंद्रीय मंत्री

टॅग्स :Parliamentसंसद