शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 18:01 IST

केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ४०० पारच्या घोषणेबाजीवरही निशाणा साधला. 

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी सुद्धा चर्चा सुरूच होती. यावेळी डीएमकेच्या खासदार डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांच्यासह अनेक खासदारांनी आपल्या पक्षांची बाजू सभागृहात मांडली. तसेच, केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ४०० पारच्या घोषणेबाजीवरही निशाणा साधला. 

"अब की बार ४०० पार" ही भाजपची घोषणा "अब की बार चोको बार" झाली आहे, असे म्हणत राज्यसभा खासदार डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी सभागृहात अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. त्या म्हणाला, "भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी 'अब की बार ४०० पार'चा नारा दिला होता, पण तो नारा 'अब की बार चोको बार' असा निघाला. जोपर्यंत तो संपत नाही, तोपर्यंत भाजपने त्याचा आनंद घ्यावा."

याचबरोबर, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनीही पेपरफुटीप्रकरणी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, पेपरफुटी प्रकरणामुळे देशात रक्तपात होत आहे. देशातील विविध परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच, राज्यांसोबत भेदभाव आणि विरोधी नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात असल्याचा आरोप डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी राज्यसभेत केला. 

दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षांनी मंगळवारी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. अहंकाराने देश चालवता येत नाही, असा दावा विरोधी पक्षांनी केला. तसेच, लोकशाहीत विरोधकांची भूमिका ठाम असते. मात्र विरोधक आणि मीडिया त्यांना 'तुकडे तुकडे गँग, खान मार्केट गँग आणि लुटियन्स गँग' म्हणत बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम