शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
2
"टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातच्या बस कशासाठी?…हा महाराष्ट्राचा अपमान’’, आदित्य ठाकरे संतापले
3
रोहित शर्माच्या हातातील ट्रॉफी प्लॅटिनमची की चांदीची? खरी की रिप्लिका? मोठी माहिती समोर
4
राहुल गांधी हाथरसला जाणार, चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार!
5
मुकेश अंबानी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; मुलगा अनंतच्या लग्नाचे दिले निमंत्रण...
6
'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी...
7
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिकची पत्नी नताशाने शेअर केला व्हिडिओ, म्हणते- "मला तुम्हाला सांगायचं आहे की..."
8
वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...
9
हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  
10
"अदानीपासून मुंबईला वाचवा, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
11
Jayant Patil : 'सोबत असणारे लोकच अजित पवारांवर टीका करतात'; जयंत पाटलांनी डिवचलं
12
'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)
13
५३ वर्षांनी अद्भूत योग: जगन्नाथ रथयात्रा २ दिवस चालणार, पाहा, रथांचे वैशिष्ट्य अन् महात्म्य
14
Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)
15
Narendra Modi And Team India : बुमराहची पत्नी, लेक अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट
16
PHOTOS : मायदेशी परतताच 'चॅम्पियन' विराटने घेतली कुटुंबीयांची भेट; बहिणीने शेअर केली झलक!
17
‘या’ ४ पैकी तारखांना झालाय तुमचा जन्म? राहुची कृपा; क्रिएटिव्ह, दूरदर्शी अन् धनवान बनतात
18
Team India ने मोदींची भेट घेतली; पंतप्रधानांच्या एका कृतीने मात्र लक्ष वेधले, वाचा सविस्तर
19
ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत
20
₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप

‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 1:41 PM

Parliament Session 2024: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उत्तर प्रदेशमध्ये झालेला पराभव तसेच रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा ज्या फैजाबाद मतदारसंघात समावेश होतो तिथे भाजपाला बसलेला पराभवाचा धक्का चर्चेचा विषय ठरलेला आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. अयोध्येतील विजय हा भारतीय जनतेच्या परिपक्वतेचा विजय आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच ‘होई वही जो राम रचि राखा’, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी भाजपाला सुनावले. 

जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर उत्तर प्रदेशात भाजपाला त्याचा फायदा होऊन मोठं यश मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या इंडिया आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला होता. त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी एका कवितेच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं. हा त्यांचा (देवाचा) निर्णय आहे, ज्यांच्या काठीला आवाज नसतो, असा टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. ते पुढे म्हणाले की, जे कुणाला आणल्याचा दावा करत होते. ते स्वत:च आज कुणाच्यातरी आधारासाठी लाचार झाले आहेत, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, संविधान हीच संजीवनी आहे. तसेच संविधानाचा विजय झाला आहे. संविधानाच्या रक्षणकर्त्यांचा विजय झाला आहे. हे सरकार चालणार नाही तर लवकरच कोसळणार आहे. आता उत्तर प्रदेशच्या जनतेला एवढाच आग्रह आहे की, ज्या गंगेचं पाणी घेऊन सत्य बोलण्याची शपथ घेतली जाते, ते गंगाजल घेऊन किमान खोटं बोलू नये. विकासाचे ढोल बडवणारे विनाशाची जबाबदारी कधी घेणार? मंदिराचं गळणारं छत आणि रेल्वे स्टेशनची कोसळलेली भिंत यांनी भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

आम्ही जे रस्ते बांधले होते. त्यावर विमानं उतरली होती. आता उत्तर प्रदेशमधील मुख्य शहरातील रस्त्यांवर होड्या फिरत आहेत. आता आणखी पाऊस पडला तर होडीमधूनच प्रवास करावा लागेल. स्मार्ट सिटीच्या आश्वासनांचीही अशीच अवस्था झालेली आहे. मागच्या १० वर्षांमधील एकमेव कामगिरी म्हणजे परीक्षा माफियांचा झालेला जन्म हीच आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.   

टॅग्स :lok sabhaलोकसभाAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीfaizabad-pcफैजाबादAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर