शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

संसदीय समिती करणार ईव्हीएम प्रकरणाची चौकशी

By admin | Published: March 15, 2017 4:09 AM

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली

हरीश गुप्ता , नवी दिल्लीबहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली तरी संसदीय स्थायी समितीने याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीमधील मतदान यंत्रांत हेराफेरी झाल्याच्या तक्रारींची ही समिती चौकशी करणार आहे.‘लोकमत’शी बोलताना गृह विभागाच्या समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध शहरे व जिल्ह्यांतून याबाबत तक्रारी आल्या आहेत. तसेच याचे पुरावेही पाठविण्यात आले आहेत. विशेषत: पुणे, नाशिक, धुळे व इतरही ठिकाणांहून अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एका उमेदवाराने तर अशी तक्रार केली आहे की, जिल्हा परिषदेसाठी माझ्या कुटुंबात २८ सदस्य आहेत. तरीही मतदान यंत्राने मला एकही मत पडल्याचे दाखवले नाही. समिती या तक्रारी एकत्रित करीत आहे व माहितीची शहानिशा केली जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी समितीच्या संपर्कात आहेत व बारकावे तपासत आहे. याबाबत अधिक काही बोलण्यास नकार देत शर्मा म्हणाले की, आम्ही आता चौकशी करीत आहोत. मतदान यंत्रात केलेल्या प्रत्येक मताची कागदी नोंद ठेवली जावी, या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबतही समिती विचार करणार आहे. तथापि, ही समिती उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात हेराफेरी झाल्याच्या एकाही आरोपाची चौकशी करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमप्रणालीचा तपास करणारी स्थायी समिती मतदान यंत्रातील हेराफेरीच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक अभियंते, पुरवठादार आणि तज्ज्ञांची मदत घेणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आगामी एमसीडी निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली आहे.