शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग आता ऐच्छिक स्वरूपाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 03:41 IST

योजनेत केला बदल; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : पीक विमा योजनेतील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी मंजूरी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेतील सहभाग आता अनिवार्य न राहाता तो ऐच्छिक स्वरुपाचा असेल. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.ते म्हणाले की, पिकाचा विमा उतरवायचा की नाही याचा निर्णय घेणे शेतकºयांवर सोपविले आहे. आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोक जसा जीवनसुरक्षा विमा काढतात, त्याच पद्धतीने शेतकºयांनी पिकाचा विमा काढायला हवा.

तोमर म्हणाले की, पीक विम्याच्या हप्त्यापोटी शेतकºयांनी काही दिवसांत १३ हजार कोटी रुपये भरले आहेत. पिकाच्या नुकसानीची भरपाई विमा कंपन्यांनी शेतकºयांना ६० हजार कोटी रुपये दिले आहेत. पीक विमा बंधनकारक असताना शेतकरी त्यात सहभागी व्हायचे, मात्र अनेक शेतकरी विम्याचे हप्ते वेळेवर भरत नसत. त्यामुळे अशा शेतकºयांना भरपाई मिळत नसे. जी राज्ये ३१ मार्चपर्यंत खरीप पीक विम्याचे व ३१ सप्टेंबरपर्यंत रब्बी पिकाच्या विम्याचे हप्ते भरतील, त्यांना त्याचे संपूर्ण लाभ मिळतील.१० हजार कृषी उत्पादक संस्थादेशात २०२३ पर्यंत १० हजार कृषी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापण्यात येणार आहे. त्यासाठी नाबार्ड एक हजार कोटी व एनसीडीसी ५०० कोटी रुपयांचा निधी देईल. या निधीतून या संस्थांद्वारे शेतकºयांना आर्थिक मदत केली जाईल. या संस्थांसाठी केंद्राने ६८६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संस्थांद्वारे दीड लाख रोजगार मिळेल. प्रत्येक जिल्'ाच्या ब्लॉकमध्ये दोन कृषी उत्पादक संस्था असतील. पिकांची मोजणी करून त्याला योग्य भाव मिळवून देण्याबरोबरच शेतकºयांच्या आर्थिक उन्नतीसाठीदेखील त्या काम करतील.दुग्धोत्पादनासाठी ४४५८ कोटी रुपयेनरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, दुग्धोत्पादन विकासासाठी ४४५८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुसरी श्वेतक्रांती व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून त्या दिशेने हे एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे ५० हजार गावांतील ९५ लाख शेतकºयांना फायदा होईल. दुग्धोत्पादन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात असताना देशातील या क्षेत्राचा विकास कसा होईल, या प्रश्नावर केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकार शेतकºयांचे हिताचे निर्णय घेत आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार