शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

पठाणकोट दहशतवादी हल्ला

By admin | Published: January 03, 2016 12:00 AM

मुंबई एटीएसला रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीनंतर प्रवाशांच्या बॅगा सामान तपासास जवानांनी सुरवात झाली. (फोटो : सुशील कदम)पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले. छ. शिवाजी टर्मिनसवर प्रवाशांची तसेच रेल्वेगाड्यांमध्ये जाऊनही रक्षकांनी तपासणी केली.पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील ...

मुंबई एटीएसला रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीनंतर प्रवाशांच्या बॅगा सामान तपासास जवानांनी सुरवात झाली. (फोटो : सुशील कदम)

पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले. छ. शिवाजी टर्मिनसवर प्रवाशांची तसेच रेल्वेगाड्यांमध्ये जाऊनही रक्षकांनी तपासणी केली.

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील चकमक अजूनही संपलेली नाही. दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांपैकी काही जणांना ठार मारण्यात आले संपुर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे

दहशतवाद्यांनी हल्ला करताच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले. यामुळे हवाई तळावर घुसण्याच्या इराद्याने हवाई तळाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातून आलेल्या दहशतवाद्यांना तळाच्या बाहेरच्या भागात असलेल्या लंगरपर्यंतच पोचता आले

पहाटेच गोळीबाराचे आवाज सुरू झाल्याने आणि काही वेळातच हेलिकॉप्टर्सची घरघर सुरू झाल्याने येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र दहशतवाद्यांना मारल्याचे वृत्त कळताच त्यांची भीती गेली.

रविवारी सकाळी शोधमोहिम सुरु झाल्यानंतर दबा धरुन बसलेले दोन अतिरेकी समोर आले. अतिरेक्यांचा नेमका आकडा अजूनही स्पष्ट झालेला नाही. मृत अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल ग्रेनेड लॉंचर आणि जीपीएस डिवाईस सापडले आहेत.

शनिवारी (२जाने) पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून चकमक सुरु आहे. शनिवारी भारतीय सुरक्षा पथकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे चकमक संपली असे वाटले होते.

आज (रविवार३ जाने) सकाळी शोधमोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी परेलेली आईडी स्फोटके निष्क्रीय करताना झालेल्या स्फोटामध्ये एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले.

शनिवारी (२जाने) पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून चकमक सुरु आहे. शनिवारी भारतीय सुरक्षा पथकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे चकमक संपली असे वाटले होते.

पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारताने उधळून लावला. सुरक्षा जवानांनी जोरदार प्रतिहल्ला करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले