शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
3
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
4
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
5
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
6
"जाता जाता महायुती सरकारकडून महाउधळपट्टी, सरकारी जाहिरातींसाठी टेंडर मागून टेंडर’’, काँग्रेसची टीका   
7
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
8
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
9
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
10
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
11
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
12
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
13
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
14
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
15
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
16
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
17
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
18
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
19
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
20
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

पठाणकोट हल्लेखोराची युपीए सरकारने केली होती सुटका

By admin | Published: May 17, 2016 3:03 PM

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहीद लतीफ याची युपीए सरकारने 2010 मध्ये सुटका केली होती

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 17 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेस सरकारने भारतीय जनता पक्षाची (भाजपा) कोंडी करण्याचा प्रयत्न केला असताना आता काँग्रेसच गोत्यात येण्याची शक्यता आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहीद लतीफ याची युपीए सरकारने 2010 मध्ये सुटका केली होती. जानेवारी महिन्यात पंजाबमधील पठाणकोट एअर बेसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी शाहीद लतीफवर होती. पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत यासाठी युपीए सरकारने 2010 मध्ये  शाहीद लतीफची सुटका केली होती. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शाहीद लतीफला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यावरुन अटक करण्यात आली होती. 11 वर्ष तो कारागृहात होता. 28  मे 2010 मध्ये लष्कर-ए-तोयबा, हिजाब-उल-मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्महदच्या 25 दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती. यामध्ये शाहीद लतीफचादेखील समावेश होता. शेजारी राष्ट्र पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत यासाठी यांची सुटका करण्यात आली होती. जम्मू, श्रीनगर, आग्रा, वाराणसी, नैनी आणि तिहारमधील कारागृहात हे सर्व दहशतवाही बंदिस्त होती. वाघा बॉर्डरमार्गे त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं. 
 
विशेष म्हणजे 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमानाचं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जेव्हा अपहरण केलं होतं तेव्हा शाहीद लतीफच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. 154 प्रवाशांना त्यावेळी बंधक म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्याबदल्यात मसुद अजहर आणि अतर दोघांची सुटका करण्यात आली होती. मात्र वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांच्या यादीतील शाहीद लतीफ आणि इतर 31 जणांची सुटका करण्यास नकार दिला होता. 
1999 मध्ये एनडीए सरकारने मुश्ताक अहमद जरगार आणि ओमर शेख यांची सुटका केली होती. अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्ल यांचं अपहरण करुन त्यांनी हत्या केली होती. 
 
दिल्लीत पठाणकोट हल्ल्याची तयारी - 
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीच्या बाहेर तसंच उत्तर आणि पश्चिम दिल्लीत छापेमारी करत 12 दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये या तीन दहशतवाद्यांचादेखील समावेश आहे. चौकशी केली असता दिल्लीतील एअरबेस तसंच दिल्ली गाजियाबाद सीमारेषेवरील मॉलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली.दहशतवाद्यांचा म्होरक्या साजीदला उत्तर-पूर्व दिल्लीच्या चांदबाग नगरमधून अटक करण्यात आली होती. तर शाकीर आणि समीर यांनी उत्तरप्रदेश आणि गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती. 
पठाणकोट हल्ला - 
2 जानेवारीला पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यामध्ये 7 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्यानंतर भारताने या हल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेल्याचे पुरावे दिले होते. तसंच या हल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याचा हात असल्याचेही ठोस पुरावे देत कारवाई करण्याची मागणी भारताने वारंवार केली होती.