शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

काश्मीर विधानसभेवरून रणकंदन! भाजपा, नॅशनल कॉन्फ्रन्समध्ये आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:59 IST

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्यानंतर राज्यपालांनी अचानक विधानसभा भंग केल्याने काश्मीरमधील वातावऱण तापले आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्यानंतर राज्यपालांनी अचानक विधानसभा भंग केल्याने काश्मीरमधील वातावऱण तापले आहे. दरम्यान, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स हे पक्ष पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप भाजपा नेते राम माधव यांनी केला होता. मात्र या आरोपामुळे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते ओमर अब्दुल्ला संतापले असून, त्यांनी न्यायालयात आरोप सिद्ध करण्याचे आव्हान भाजपाला दिले आहे.  बुधवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतरी जम्मू काश्मीरची विधानसभा भंग कण्याचा निर्णय राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घेतला होता. त्यानंतर गुरवार सकाळपासून भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, भाजपा नेते राम माधव यांनी नॅशनल काँन्फ्रन्स आणि पीडीपीने सीमेपलीकडून मिळालेल्या सूचनेनंतर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या असाव्यात, अशी शंका उपस्थित केली. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रन्स हे तेच पक्ष आहेत. ज्यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार घातला होता. त्यांना पाकिस्तानमधून तशी सूचना मिळाली होती, असा दावाही माधव यांनी यावेळी केला. 

दरम्यान, माधव यांच्या या वक्तव्यामुळे नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते ओमर अब्दुल्ला संतप्त झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध करून दाखवण्ये आव्हान भाजपाला दिले आहे.   

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरdemocracyलोकशाहीBJPभाजपाPDPपीडीपी