शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

४० टक्के अपंगत्व असणाऱ्यांनाही पेन्शन

By admin | Published: April 04, 2016 11:53 PM

‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत अगोदर दिव्यांगांना (शारीरिक अपंगत्व) घरे वितरित करण्यात येतील आणि त्यानंतर इतरांच्या अर्जावर विचार केला जाईल.

प्रमोद गवळी, नवी दिल्ली‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत अगोदर दिव्यांगांना (शारीरिक अपंगत्व) घरे वितरित करण्यात येतील आणि त्यानंतर इतरांच्या अर्जावर विचार केला जाईल. याशिवाय ४० टक्के अपंगत्व असलेल्या लोकांनादेखील पूर्ण पेन्शन मिळेल आणि सर्व दिव्यांगांना संपूर्ण देशभरात मान्य राहील, असे सामान्य (युनिव्हर्सल) ओळखपत्र देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री कृष्णपालसिंग गुर्जर यांनी महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमधून आलेल्या दिव्यांगांना दिले.‘तुम्हाला (दिव्यांगांना) आपल्या मागण्यांसाठी पुन्हा दिल्लीत येण्याची गरज पडणार नाही, असे आश्वासन मोदी सरकारतर्फे मी देतो. तुमच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. सध्या दिव्यांगांसाठी विविध विभागांतर्फे योजना राबविण्यात येत आहेत. त्या सर्व योजना एका छत्राखाली आणण्याची आवश्यकता आहे आणि सरकार हे काम अवश्य करेल,’ असे गुर्जर म्हणाले.महाराष्ट्राच्या अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात किमान चार हजारावर दिव्यांग आपल्या विविध मागण्या घेऊन सोमवारी नवी दिल्लीत धडकले. आधी इंडिया गेटजवळ निदर्शने करण्याची त्यांची योजना होती. परंतु आ. कडू यांना केंद्र सरकारतर्फे चर्चेचे निमंत्रण मिळाल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. चर्चेचे निमंत्रण स्वीकारून आ. कडू सकाळी ११ वाजता शास्त्री भवन येथे पोहोचले. त्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत राज्यमंत्री गुर्जर यांच्यासोबत दिव्यांगांच्या १९ मागण्यांवर चर्चा केली. त्यानंतर गुर्जर आणि कडू यांनी हिंदू महासभेच्या कार्यालयात थांबलेल्या दिव्यांगांना संबोधित केले.‘गुर्जर यांच्याशी झालेली चर्चा सकारात्मक राहिली. गुर्जर यांनी दिव्यांगांच्या अनेक मागण्या मौखिकरीत्या मान्य केल्या. लेखी आदेश जारी करण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावाच लागेल. त्यामुळे आम्ही हे आंदोलन सहा महिन्यांसाठी स्थगित करीत आहोत,’ असे कडू यांनी पत्रकारांना सांगितले.आ. कडू म्हणाले, दिव्यांगांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारी पेन्शन आता त्यांच्या जन्मापासूनच दिली जाईल, असे आश्वासन गुर्जर यांनी दिले आहे. दिव्यांगांना ग्राम विकास विभागातर्फे पेन्शन दिली जाते, जे तांत्रिकदृष्ट्या अनुचित आहे. पेन्शन सामाजिक न्याय विभागातर्फे दिली गेली पाहिजे. त्यासाठी व्यापक पंजीकरण व्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळे पेन्शन, पास, लायसन्स, शिक्षण, घर आदीबाबतच्या समस्या सहज सुटतील.कोल्हापूरहून बाईकने आले!कोल्हापूर जिल्ह्णाचे रहिवासी ६५ वर्षीय बलवंत पाटील हे आपल्या मोटारसायकलवर स्वार होऊन २४०० किलोमीटरचा प्रवास करीत नवी दिल्लीत पोहोचले. आपल्या देवाळे या गावाहून ३० मार्च रोजी दिल्लीला रवाना झालेले पाटील रविवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले.