शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लोकांवर विचारसरणी लादली जातेय

By admin | Published: October 18, 2015 2:08 AM

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

बक्सर (बिहार) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे आयोजित पक्षाच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. मोदी सरकारच्या कार्यकाळात सांप्रदायिक उन्माद निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करून गांधी म्हणाल्या, अफवांवरून निर्दोष लोकांचे बळी जात आहे. यामुळे देशाची लोकशाही आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. सहा दशकांच्या काँग्रेस शासनावर मोदींकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने देशात लोकशाही बळकट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि मोदी यांचे पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच फलित आहे. याउलट केंद्रातील भाजपाप्रणीत सरकार मात्र लोकशाही मूल्यांपासून भरकटले आहे. लोकांवर आपली विचारसरणी थोपून हे सरकार लोकशाहीसाठी मोठा धोका निर्माण करीत असून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात येत आहे, असे प्रत्युत्तर गांधी यांनी दिले. दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लीम इसमाची झालेली हत्या, बुद्धिजीवींवरील वाढलेले हल्ले आदी घटनांचा उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)पंतप्रधान अपयशी ठरलेत- महागाई आकाशाला भिडली असून सर्वसामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे.- महिला व युवापिढीला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास पंतप्रधान अपयशी ठरले आहेत.- काँग्रेसने ६० वर्षात काय केले अशी विचारणा केली जाते. आमच्या पक्षाने अनेक क्षेत्रात क्रांतिकारक बदल केले. काँग्रेसने या देशाची एकता, अखंडता आणि वारसा जपून ठेवला.- बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या २८ आॅक्टोबरला ५० जागांवर मतदान होणार आहे.