शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'लोक कोरोनाकडे दुर्लक्ष करू लागलेत, तिसरी लाट केव्हाही धडक देईल'; शास्त्रज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:15 IST

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत.

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. सार्वजनिक आणि पर्यटन स्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवत लोक गर्दी करत आहेत. यावर शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी समाजाची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि सध्या लोक संकट पाहू शकत नाहीतयत असं दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या वृत्ती बदल करण्यासाठी सरकारची भूमिका अतिशय महत्वाची असते. पण दुर्दैवानं देशातील जनतेचा राजकीय पक्षांवर खूप कमी विश्वास राहिला आहे, असंही स्पष्ट मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

कोरोना प्रादुर्भावाचं गांभीर्य आणि लसीकरणाच्या वेगाचा दराबाबतच्या अस्पष्ट भूमिकेमुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये डोंगराळ भागातील पर्यटन स्थळांवर लोक गर्दी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचंही दिसून आलं आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून आपलं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याच्या भानगडीत लोक संकटाला निमंत्रण देत आहेत, असं शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे. 

कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष करणं, नियमांबाबत लोकांची उदासीन वृत्ती आणि जे होईल ते देवाच्या मर्जीनं होईल अशा भावनेतून वागणं घातक ठरू शकतं, असं साथरोग तज्ज्ञ ललित कांत यांनी म्हटलं. मास्क न वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणं यातून लोकांना समोरील संकट दिसत नाहीय हेच लक्षात येतं. तिसरी लाट कोणत्याही क्षणी धडक देऊ शकते याचा विचार करायला हवा, असं मानवी वर्तवणूक आणि संबद्ध विज्ञान संस्थेचे संचालक निमेश देसाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस