शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लाेक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले, त्यांना हवी तडजाेड...; लोक अदालत सप्ताहात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 6:26 AM

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली.

नवी दिल्ली : लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना आता केवळ तडजोड हवी आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले. 

सर्वोच्च न्यायालयात आयोजित विशेष लोक अदालत सप्ताहानिमित्ताने सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले की, लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना कोणतीही तडजोड हवी आहे. बस्स, न्यायालयापासून आम्हांला दूर करा, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे एक शिक्षाच असून, ही बाब आपणा सर्वांसाठीच चिंतेची आहे. लोक अदालत हा तडजोडीसाठी उत्तम पर्याय आहे, असे चंद्रचूड म्हणाले.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली. मी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून देशभरातून अधिकारी आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरुवातीला सात पीठांपासून लोकअदालतीला सुरुवात करण्यात आली होती. आम्ही यशस्वी होऊ काय, याबाबत आम्ही साशंक होतो. गुरुवारपर्यंत १३ न्यायपीठे झाली असून, त्यांच्याकडे भरपूर काम आहे. न्याय लोकांच्या घरापर्यंत घेऊन जाणे हा लाेक अदालतीचा हेतू आहे. प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे हाही त्यामागील एक उद्देश आहे.     - डी. वाय. चंद्रचूड, सरन्यायाधीश

पहिली लोकअदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केलीपहिली लोक अदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केली होती. कौरव व पांडव यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रामधारीसिंह दिनकर यांच्या रचनेचा दाखला देत, भगवान कृष्णाने शांततेच्या मार्गाने समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. विवाहाशी निगडित वादांवर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी न्यायालयाचे कौतुक केले. कधी काळी कुटुंबातील वादावर घरातील वरिष्ठ नागरिक तोडगा काढत होते. आता मात्र वादावर तोडगा काढण्याचे काम व्यवस्थेला करावे लागत आहेत, असे मेघवाल म्हणाले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय