शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

देशाची जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी - पोल

By admin | Published: January 27, 2016 10:00 AM

देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे एका सर्व्हेतून समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - असहिष्णूतेच्या मुद्यावरून देशातील वातावरण तापलेले आहे. केंद्रातील मोदी सरकारलाही त्याचा फटका बसल्याचे वाटत असतानाच सरकारसाठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे 'एबीपी न्यूज-निल्सन'च्या सर्व्हेतून समोर आलं आहे. गेल्या २० महिन्यांतील मोदी सरकारचं काम समाधानकारक असल्याचे सांगत मोदींनी दाखवलेले अच्छे दिनांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं ब-याचशा (४२ टक्के) लोकांचं मत आहे. तसेच आजच्या घडीला पुन्हा निवडणुका झाल्यास एनडीए सरकारच बहुमताने निवडून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास अनेकांनी वर्तवल्याचे या पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे. 
देशातील ४६ टक्के लोकांनी मोदी सरकारची कामगिरी चांगली असल्याचे म्हटले असून सरकारपेक्षाही नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक कामगिरी वरचढ असल्याचे अनेकांना वाटते. सुमारे ५४ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी चांगली वा खूप चांगली असल्याचे म्हटले आहे. गेल्या दीड वर्षात सरकारचा कारभार चांगला वा खूप चांगला असल्याबाबत अंदाजे ४६ टक्के लोकांनी मान्यता दिली. 
 
सर्वात लोकप्रिय नेता कोण?
देशाच्या जनतेवर नरेंद्र मोदींचा करिष्मा अद्यापही कायम असल्याचे या सर्व्हेत दिसून आले. देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न विचारला असता ५८ टक्के लोकांनी मोदींचे नाव घेतले तर त्यांच्यापाठोपाठ ११ टक्के सहभागींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेतले. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ४ टक्के लोकांनी पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र अवघ्या १ टक्के नागरिकांना लोकप्रिय नेते वाटतात. 
वादग्रस्त मुद्यांवर जनतेचं मत काय?
दादरी प्रकरण, पठाणकोट हल्ला, पाकिस्तानबाबतचे सरकारचे धोरण या आणि अशा अनेक वादग्रस्त मुद्यांवर जनतेने परखडपणे मत नोंदवले आहे. सरकारनं थेट लष्करी कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवावा असे ६५ टक्के जनतेचे मत आहे. तर पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला सरकारला आणखी योग्य पद्धतीने हाताळता आला असता असे ३६ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर सरकारला हा हल्ला योग्य रितीने हाताळता आला नसल्याची टीका १५ टक्के सहभागींनी केली आहे. बीफच्या मुद्यावरून दादरी येथे झालेल्या हत्याकांडाप्रकरणी मोदींनी मौन न बाळगता वक्तव्य करणे गरजेचे होते असे ५० टक्के जनतेचे मत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आवरण्यात मोदी अपयशी ठरल्याचे ३८ टक्के लोकांचे नमूद केले आहे.