शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जनतेने 18% GST लावला अन् BJP च्या जागा 303 वरुन 240 वर आल्या; AAP खासदाराची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 18:04 IST

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा वाढती महागाई, घसरलेले उत्पन्न आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Raghav Chadha in Rajya Sabha : केंद्र सरकारने 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता संसदेत त्यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज राज्यसभेतील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी भाजपवर बोचरी टीका केली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमी झालेल्या जागांवर बोलताना ते म्हणाले की, देशातील जनतेने भाजपच्या जागांवर 18 टक्के जीएसटी लावला आणि पक्षाची संख्या 240 वर आणली.

यावेळी राघव यांनी वस्तू आणि सेवा करात (GST) सुधारणा, पुनरावलोकन आणि सुलभीकरण सुचवले. तसेच, जीएसटीचे 'गब्बर सिंग टॅक्स' असे वर्णन करत म्हणाले की, 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या. पण, यंदा या देशातील जनतेने भाजपच्या जागांवर जागांवर 18% GST लावला आणि संख्या 240 वर आणली. आपल्या भाषणात राघव चढ्ढा यांनी ग्रामीण भागातील वाढती महागाई, घसरलेले ग्रामीण उत्पन्न, अन्नधान्याची वाढती महागाई आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

घसरलेले ग्रामीण उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरुन सरकारवर टीका करताना चढ्ढा म्हणाले की, 2023-24 या आर्थिक वर्षात ग्रामीण उत्पन्नाची वाढ दशकाच्या नीचांकावर आहे आणि वास्तविक ग्रामीण वेतनात गेल्या 25 महिन्यांत सातत्याने घट झाली आहे. आज परिस्थिती अशी आहे की, 2014 मध्ये 3 किलो डाळ विकत घेणारा मजूर आज तीच डाळ फक्त 1.5 किलो खरेदी करू शकतो. 

ते पुढे म्हणाले, आज आपण भारतात ब्रिटनप्रमाणे कर भरत आहोत आणि सोमालियासारख्या सेवा मिळत आहेत. अन्नधान्य महागाई 9 ते 9.5% दरम्यान आहे. ज्या वस्तूंवर आपण स्वावलंबी होतो आणि ज्यांची निर्यातही करत होतो, त्या वस्तूंमध्येही आपण महागाईचा अनुभव घेत आहोत. 2014 मध्ये एक किलो गव्हाची किंमत 21 रुपये होती, ती 2024 मध्ये वाढून 42 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. ही परिस्थिती वाढती महागाई आणि घसरलेल्या वेतनाचा परिणाम आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा