शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पाणीटंचाईमुळे चेन्नईत लोकांचे स्थलांतर; बंगळुरूकडे घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 02:59 IST

चार तलावांची पाणीपातळी घटली, काही भागात दहा दिवसांनी पाणी

चेन्नई : यंदा तीव्र पाणीटंचाईची झळ चेन्नईसारख्या महानगरालाही सोसावी लागत असून, तेथील अनेक रहिवासी शहर सोडून अन्यत्र राहायला गेले आहेत. जे सुट्टी घेऊन फिरायला गेले होते त्यांनी चेन्नईमध्ये परतणे लांबणीवर टाकले आहे.

चेन्नईला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही तलावांची पाणीपातळी खूपच घटली आहे. पाणी मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. शहराच्या कोडम्बक्कम भागात वर्षानुवर्षे राहणारे अनेक जण नाईलाजास्तव के. के. नगरामध्ये राहायला गेले आहेत. तेथे दिवसभरात तीन तास पाणीपुरवठा होतो. पाणी येण्याच्या वेळेस घरात कोणी नसले तर त्यांची खूपच पंचाईत होते.

पेरूनगुडीचे रहिवासी एम. एस. श्रीकांत हे आपल्या कुटुंबासह दोन दिवस नातेवाईकांकडे राहायला गेले. त्यानंतर ते रेल्वे प्रवास करून बंगळुरूला बहिणीकडे गेले. ते काही सहलीला गेले नव्हते. श्रीकांत म्हणाले की, आम्ही जिथे राहतो तिथे दहा दिवस पाणीपुरवठाच झाला नव्हता. त्यामुळे दुसरीकडे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. पाणीटंचाईमुळे आता पुढचा मुक्काम कोणाकडे करायचा हा विचार त्यांचा मनात घोळत असतो. चेन्नईतील अनेक जण थेट केरळला नातेवाईकांकडे राहायला गेले होते. 

१७ जिल्हे दुष्काळग्रस्तगेली दोन वर्षे झालेल्या पावसामुळे भूजल पातळी घटली आहे. चेन्नई, कांचीपुरम यांसह १७ जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले. या जिल्ह्यांत गेल्या वर्षी १९ ते ५६ टक्के इतकाच पाऊस पडला होता. एकीकडे पाण्याची टंचाई, तर कडक उन्हाळा यामुळे या जिल्ह्यातील लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी शहराची वाट धरली आहे.