शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

जनता मोदींना इंदिराजींप्रमाणे धूळ चारेल

By admin | Published: February 01, 2016 2:13 AM

नरेंद्र मोदी यांचीही गत इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होईल, केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा आहे. जनता त्यांना धूळ चारेल, अशी शापवाणी करीत खळबळ उडवून

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचीही गत इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होईल, केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा आहे. जनता त्यांना धूळ चारेल, अशी शापवाणी करीत खळबळ उडवून दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लगेच घूमजाव केले आहे. मोदी सरकारमध्ये देशाशी संवाद साधण्याचा अभाव असल्याकडे लक्ष वेधत सिन्हा यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून, सिन्हा यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे. सिन्हा यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत रविवारी सारवासारव चालविली होती.गोव्यातील डोना पौला येथे शनिवारी ‘डिफिकल्ट डायलॉग्ज’ या परिषदेत गट चर्चेत सहभागी होताना सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता मोदींना धूळ चारेल. त्यासाठी तुम्हाला केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, खुलासा करताना सिन्हा यांनी मोदींसंदर्भात विधान केल्याचा इन्कार केला आहे. ज्यांनी कुणी हे वृत्त दिले त्यांनी चुकीचा अर्थ काढला. सध्या मी, माझे आणि माझ्यासाठी ही संस्कृती आली असून, अशावेळी संवाद साधण्यात काय अर्थ, असा सवालही त्यांनी केला होता. लोकप्रतिनिधींनी सातत्याने जनतेकडे जाऊन संवाद साधायला हवा, असे सांगत त्यांनी १९७५ च्या आणीबाणीचे स्मरण करवून दिले. असंतोषाचा आवाज दडपण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली असता देशात काय घडले, भारतातील जनतेने कसे उत्तर दिले ते सर्वांना माहीत आहे. पथभ्रष्टता येथे तेथे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने काही बाबी घडत आहेत, ते पाहता सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण गंभीर असायलाच हवे. थोर भारतीय समुदाय त्याची काळजी घेईल. संवाद साधण्यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना जनता धूळ चारेल. त्यासाठी केवळ पुढील निवडणुकीपर्यंतच वाट बघावी लागेल, असा इशाराही सिन्हा यांनी दिला. करवून दिले आणीबाणीचे स्मरणकाही लोक असहिष्णुतेबाबत बोलतात तेव्हा मी त्यांना इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे स्मरण करवून देतो. १९७७ मध्ये जनतेने इंदिराजींना धडा शिकवला होता. कारण चर्चा दडपणे किंवा असहिष्णुता आपल्या रक्तात नाही. त्यामुळेच लोकशाही आणि संवाद दोन्ही जिवंत राहिले आहेत, असेही सिन्हा म्हणाले. आणीबाणीचा काळ १९ महिन्यांचा होता. त्यानंतर जनतेने काँग्रेसचे सरकार उलथवून लावले होते. सध्या मोदी सरकारलाही तेवढाच काळ झाला आहे, असा संदर्भही त्यांनी दिला.मंत्रिपद न मिळाल्यामुळे यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा निराधार वक्तव्ये करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे खा. रवींद्र कुशवाह यांनी रविवारी केली. पुत्र जयंत सिन्हा हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत. मात्र, तेवढ्यावर यशवंत सिन्हा यांचे समाधान झालेले नाही. बिहारच्या निवडणुकीनंतर शत्रुघ्न सिन्हा हेही आत्मघातकी विधाने करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.