शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

भयावह! 'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर, भीतीने लोकांनी सोडलं राहतं घर; 50 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 14:41 IST

People scared mysterious fever 60 families fled in village : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. तापाच्या धसक्याने लोकांनी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,28,57,937 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 47,092 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 509 जणांचा मृत्यू झाला आहे, कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,39,529 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. तापाच्या धसक्याने लोकांनी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक शहरातील शेकडो लोकांना ताप आला आहे. याठिकाणी रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. 

फिरोजाबादमध्ये रहस्यमयी आजाराने आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मथुरामध्ये गेल्या 15 दिवसांत 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. चिमुकल्यांसह मोठ्यांचा देखील मृत्यू होत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फरहच्या एका गावात महामारीमुळे लोकांनी आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राहत्या घराला टाळं लावून ते दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकांकडे राहायला गेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची देखील चाचणी केली आहे. याचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती, 50 जणांचा मृत्यू

आठवड्याभरात 26 लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये रहस्यमयी आजार पसला आहे. यामध्ये लोकांना खूप ताप येऊन त्यांचा मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, मॅनपुरी, एटा आणि कासगंज जिल्ह्यामध्ये 50 लोकांचा ताप, डिहायड्रेशन आणि प्लेट्सलेट अचानक कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 26 लहान मुलांचा समावेश आहे. या रहस्यमयी आजारातून बरं होण्यासाठी लोकांना 12 दिवसांहून अधिक काळ लागत आहे. 

रुग्णालयात एका बेडवर दोन किंवा तीन रुग्णांवर उपचार

सरकारी रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रहस्यमयी आजार चिंतेचा विषय आहे. फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात एका बेडवर दोन किंवा तीन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डॉ. हंसराज सिंह यांनी हा रहस्यमयी आजार असलेल्या 100 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे. आग्रा जिल्हा रुग्णालयातील डॉ. एके अग्रवाल यांनी दररोज 200 रुग्ण आढळून येत असल्याचं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन आठवड्यापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल