शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

मोदींना सत्ता देणारी जनता २ वर्षांतच निराश

By admin | Published: March 03, 2016 3:32 AM

देशाच्या सीमांचे संरक्षण,काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव वा वर्षाकाठी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तमाम आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे संरक्षण,काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव वा वर्षाकाठी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तमाम आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने २८२ उमेदवार विजयी करून, भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र अवघ्या २ वर्षात धार्मिक ध्रुवीकरणाचा विद्वेष पसरवून जनतेला सरकारने निराश केले आहे. सरकारवर केवळ टीका करण्यासाठी हे मुद्दे आपण बोलत नसून या विषयांबाबत पंतप्रधानांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना केले. त्यांचे पूर्ण भाषण पंतप्रधान मोदींनी शांतपणे ऐकले. आपल्या भाषणात आझाद यांनी अभिभाषणातील त्रुटींचा उल्लेखही केला.धार्मिक धु्रवीकरणाचा मुद्दा अधोरेखित करतांना लव्ह जिहाद, घरवापसी, ख्रिश्चन चर्चेसवर चढवण्यात आलेले हल्ले, भाजपचे खासदार, मंत्री, व समर्थकांव्दारे वारंवार सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा उल्लेख करीत आझाद म्हणाले, पंतप्रधान मोदी तुम्हाला धोका आमच्यापासून नव्हे तर तुमच्या पक्षांतर्गत सहकाऱ्यांकडून आणि समर्थकांकडूनच अधिक आहे. (विशेष प्रतिनिधी)