शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

"कदाचित अमित शहांना माहिती देणारे अभ्यास करुन आले नसावेत", खा. सुळेंचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:39 AM

यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती

मुंबई/यवतमाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी १५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये विदर्भ दौऱ्यावर आले असता त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती बांदूरकर यांच्या झोपडीला भेट देऊन आत्महत्येमागील परिस्थिती जाणून घेतली होती. संसदेत कलावतीचा विषय निघाल्याने राहुल गांधींची ती भेट पुन्हा चर्चेत आली. या भेटीनेच कलावतीचे आयुष्य बदलून टाकले. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कलावतीचा उल्लेख संसदेत करताना मोदी सरकारमुळेच त्यांना मदत मिळाल्याचं म्हटलं. पण, आपणास काँग्रेसमुळेच मदत मिळाल्याचं स्वत: कलावती यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आता खासदार सुप्रिया सुळेंनी अमित शहांना चिमटा काढला आहे.   

यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या या घटनेनंतर २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अचानक जळका गावी जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कलावती यांच्या झोपडीवजा घराला भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या घरी चहाही घेतला. त्यानंतर दिल्लीला परतल्यावर लोकसभेच्या सभागृहात राहुल यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा सभागृहात मांडत कलावतीचा मुद्दा उपस्थित केला. संसदेतील या चर्चेने कलावती देशभरात प्रकाशझोतात आल्या होत्या. तर, त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला होता.  

संसदेत सध्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून मणिपूर हिंसाचारामुळे महिलांच्या मुद्द्यावरुन चर्चा झडत आहेत. त्यावर, बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत कलावतींना मोदी सरकारमुळेच मदत मिळाल्याचं म्हटलं. त्यानंतर, मीडियाशी बोलताना कलावती यांनी स्वत: हे ऐकून वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. तसेच, काँग्रेस काळातच मला मदत मिळाली, मोदींच्या काळात काहीच नाही, असेही स्पष्ट केले. त्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन अमित शहांना लक्ष्य केलं.  

मंत्रीमहोदयांनी सभागृहात बोलताना संपूर्ण माहिती घेऊन बोलणे अपेक्षित असते. कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांना माहिती देणारे नीट अभ्यास करुन आलेले नसावेत. मंत्रीमहोदयांनी आपली सुत्रे तपासून घ्यायला हवीत, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दरम्यान, सुप्रिया यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला, तर अभ्यास शब्द वापरत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही त्यांचा रोख असल्याचं दिसून येत आहे.  

काय म्हणाल्या कलावती

बुधवारी सभागृहात माझ्या अनुषंगाने पुन्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघाल्याचे समजले. माझा मुलगा प्रीतम यानेही मला चर्चेबाबत सांगितले. ऐकून वाईट वाटले. खरे तर राहुल गांधी यांच्या भेटीनंतरच माझे आयुष्य रुळावर आले. जे काही मिळाले ते २०१४ पूर्वीच मिळाल्याचे कलावती यांनी सांगितले. प्रीतम याचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले असून तो वणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्यानेही राहुल गांधी यांच्या भेटीनंतर कुटुंबामध्ये झालेला बदल कथन केला.

असं बदललं कलावतींचं आयुष्य

राहुल गांधींनी भेट घेतल्यानंतर कलावती यांच्यासाठी विविध स्तरांतून मदतीचा ओघही सुरू झाला. सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी तातडीने कलावतींच्या जळका गावी जाऊन भेट घेतली आणि ३६ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीतून कलावतीने कर्जाची परतफेड तर केलीच. शिवाय उरलेली रक्कम बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली आणि  यातून मिळणाऱ्या पैशांवर सात मुली आणि दोन मुले अशा मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. एवढेच नव्हे तर याच पैशातून तिने मुलींची लग्न आणि मुलांचे शिक्षणही पूर्ण केले. 

या भेटीनंतरच काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही कलावतीची भेट घेऊन शासकीय योजनेतून कलावतीला घरकुल, वीजजोडणी, पिण्याच्या पाण्याचा नळ, टिनपत्रे अशी मदत केली होती. राहुल गांधी यांच्यामुळेच मला जगण्याचा मार्ग मिळाल्याचे कलावती आवर्जून सांगतात.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरीSupriya Suleसुप्रिया सुळे