शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

सीतेचा त्याग केला म्हणून भगवान रामाविरुद्ध याचिका

By admin | Published: February 01, 2016 2:08 AM

एका धोब्याच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग करणाऱ्याा भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध बिहारच्या सीतामढी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

एस.पी. सिन्हा,  पाटणाएका धोब्याच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग करणाऱ्याा भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध बिहारच्या सीतामढी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या आधारावर भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध खटला दाखल करता येईल का, याचा निर्णय न्यायालय यावेळी घेईल.सीतामढीच्या डुमरी कला गावातील रहिवासी असलेले ठाकूर चंदन सिंह यांनी शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही याचिका दाखल केली. एका धोब्याच्या सांगण्यावरून भगवान रामचद्रांनी सीतेचा त्याग केला. लक्ष्मणानेही याकामी भगवान रामचंद्रांची साथ दिली. सीतेची कुठलीही चूक नव्हती. कुठलाही पुरुष पत्नीवर इतका मोठा अन्याय कसा करू शकतो? जी पत्नी आपन्या पतीसोबत एकनिष्ठ राहून त्याच्या सुख-दु:खात सोबत देते, तिला इतकी मोठी शिक्षा का? असे अनेक प्रश्न ठाकूर चंदन सिंह यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केले आहेत.या पार्श्वभूमीवर ठाकूर चंदन सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. आपल्या याचिकेचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा नसून सीतेला न्याय मिळवून देणे हा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्त्रियांवरील अन्याय त्रेता युगापासून सुरू झाला. त्रेता युगातील स्त्रीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कलियुगातील महिलांनाही न्याय मिळणार नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे. भगवान रामचंद्र यांच्या विवेकावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. भगवान रामचंद्र यांची विवेकबुद्धी योग्य होती का? यावर चर्चा व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.सीतेच्या विवाहासाठी रचलेल्या स्वयंवरात भगवान रामचंद्रांनी शिवजीचे धनुष्य तोडले आणि सीतेशी विवाह केला. यानंतर ते पिता दशरथ यांच्या इच्छेखातर १४ वर्षांच्या वनवासात निघून गेले. यावेळी सीतेनेही पत्नीधर्माचे पालन करीत त्यांच्या सोबत वनवासात जाण्याच्या निर्णय घेतला. १४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीरामचंद्र यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्याच नगरीत एक धोबी राहत असतो. पत्नी परपुरुषासोबत राहिल्यानंतरही तिचा स्वीकार रामाने केला; पण मी तसे करणार नाही, असे एक धोबी त्याच्या पत्नीला म्हणाला आणि गुप्तहेरांमार्फत भगवान रामचंद्र यांच्या कानावर पडले आणि यानंतर रामाने सीतेचा त्याग केला, अशी कथा आहे.