शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

तुरुंगांमधील कैदयांची गर्दी घटविण्याची योजना राबवा

By admin | Published: October 04, 2016 3:42 AM

देशातील बहुसंख्य राज्यांच्या तुरुंगांमध्ये क्षमतेहून कितीतरी अधिक कैदी कोंबल्यामुळे निर्माण झालेल्या

नवी दिल्ली: देशातील बहुसंख्य राज्यांच्या तुरुंगांमध्ये क्षमतेहून कितीतरी अधिक कैदी कोंबल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून, सर्व राज्यांनी तुरुंगांमधील ही वारेमाप गर्दी कमी करण्याची कृती योजना येत्या ३१ मार्चपूर्वी तयार करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.या आधी असाच आदेश ६ मे रोजी देऊनही एकाही राज्य सरकारने त्या अनुषंगाने काहीही पावले उचललेली नाहीत, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. आर. के. अगरवाल यांच्या खंडपीठाने हा आदेश पुन्हा दिला.या आधी मेमध्ये झालेल्या सुनावणीत देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १४९ तुरुंगांमध्ये क्षमतेहून दीडपट जास्त कैदी कोंबलेले आहेत, अशी माहिती राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे अ‍ॅमायकस क्युरीने न्यायालयास दिली होती. त्यात महाराष्ट्रातील १६ कारागृहांचा समावेश होता. तुरुंगांमधील प्रमाणाबाहेर गर्दीच्या प्रश्नाकडे एककल्ली पद्धतीने पाहून चालणार नाही. हा विषय गंभीर असून, त्यामुळे सुरक्षेखेरीज आरोग्य, स्वच्छता व तुरुंग व्यवस्थापनाच्याही समस्या निर्माण होऊ शकतात, याकडे लक्ष वेधूनही राज्यांनी गेल्या सहा महिन्यांत काहीही न केल्याने, परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिक शोचनीय बनली आहे, याबद्दल खंडपीठाने खेद व्यक्त केला.