शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
6
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
7
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
8
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
9
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
10
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
12
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
13
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
14
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
15
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
16
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
17
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
19
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
20
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

“भारत शक्य ती सर्व मदत करण्यास तयार”; म्यानमारमधील भूकंपाच्या विध्वंसावर पंतप्रधान मोदींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:37 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपावर चिंता व्यक्त केली.

PM Modi on Myanmar Thailand Earthquake:म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भुकंपामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी सकाळी ११.५० च्या सुमारास म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा प्रभाव भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह पाच देशांमध्येही जाणवला. म्यानमार आणि थायलंडमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्यानमारमधील या तीव्र भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या मदतीसाठी भारत मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

शुक्रवारी सकाळी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराजवळ होता. या भूकंपामुळे इमारती आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली. म्यानमारमध्ये भूकंपामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर २०० लोक जखमी झाले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकामाधीन असलेली ३० मजली इमारत कोसळली. या साइटवर ४०० लोक काम करत होते. यापैकी ८० लोक बेपत्ता आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या भीषण विध्वंसाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

“म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थिती पाहून मी चिंतेत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करुयात. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले आहे. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्याबाबतही चर्चा केली आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भूकंपाच्या विध्वसांमुळे थायलंडमध्ये उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बँकॉकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.मोठ्या इमारती कोसळल्यामुळे थायलंडमध्ये सध्या अनेक लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे भूकंपामुळे म्यानमारमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत म्यानमारमध्ये भूकंपाचा धक्का!

दरम्यान, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात १५-२० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार होता. भारतात आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMyanmarम्यानमारThailandथायलंडEarthquakeभूकंप