शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

२०२४ मध्ये पक्षाचा चेहरा कोण? ७५ वर्षांच्या जवळ पोहोचलेल्या मोदींनी जाहीर करावं; भाजपच्याच खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:45 PM

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी

नवी दिल्ली: वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये असं म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा चेहरा कोण असेल ते सांगावं, अशी मागणी भाजपचेच खासदार असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींनी कोणत्याही पदावर राहू नये असं स्वत: मोदीच म्हणाले होते. त्यामुळेच त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांच्यासारख्या नेत्यांना मुख्य प्रवाहापासून दूर केलं. त्यामुळे २०२४ मध्ये भाजपचा चेहरा कोण असणार, हे मोदींनीच सांगावं, असं स्वामी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करायला हवा. कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्यास वाजपेयींसारखी परिस्थिती होईल. २०२४ च्या निवडणुकीतही भाजपची सरशी होईल आणि सत्ता कायम राहील, असंदेखील स्वामी यांनी म्हटलं. 'ईटीव्ही भारत'सोबतच्या एका संवादादरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनसोबतचा संघर्ष, कोरोना स्थिती, त्याचा सर्वसामान्यांना बसलेला फटका, २०२४ ची निवडणूक यावर भाष्य केलं.

चीनसोबत आपलं सरकार बातचीत का करत आहेत तेच समजत नाही, असं स्वामी म्हणाले. 'ते आपल्या भूभागावर ठाण मांडून बसले आहेत आणि आपण संवाद साधत आहोत. त्यापेक्षा चीनसोबत युद्ध करायला हवं. भारत आणि आमची तुलनाच होऊ शकत नाही हे दाखवण्यासाठी चीनच्या कुरापती सुरू आहेत आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले आहेत. चीननं जेव्हा घुसखोरी केली, तेव्हाच आपण जोरदार प्रत्युत्तर द्यायला हवं होतं,' असं स्वामी यांनी म्हटलं. चिनी सैनिक आपल्या भूमीत आलेच नाहीत, हे मोदींचं विधान खोटं होतं, असंही स्वामी म्हणाले.

आम्ही करून दाखवलं असं आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अगदी छातीठोकपणे सांगत होतो. याच अहंकारानं आपलं नुकसान झालं. कोरोना संकटाचा फटका प्रत्येक वर्गाला बसला. सर्वाधिक नुकसान गरिबांचं झालं. पहिली लाट गेल्यानंतर आपण ढोल बडवत राहिलो. दुसरी लाट येऊ शकतो याचा आपल्याला विसर पडला आणि आता तिसरी लाट येईल या भीतीखाली आपण वावरत आहोत, अशा शब्दांत स्वामींनी अप्रत्यक्षपणे सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर तोंडसुख घेतलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी