शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
2
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
3
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
4
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
5
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
6
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
7
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
8
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
9
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
10
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
11
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
12
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 
13
“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला
14
मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...
15
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
16
Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे
17
OTTनंतर जुनैद खान झळकणार रुपेरी पडद्यावर, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस
18
स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर
19
NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ
20
छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या; म्हणाल्या, "दीपिका, आलियासारखं..."

"जे फाळणीच्या भयावहतेने..."; PM मोदींनी भारत-पाकिस्तान फाळणीतील पीडितांना अर्पण केली श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:21 AM

ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताची फाळणी केली होती. यानंतर पाकिस्तानच्या रुपाने नव्या देशाचा जन्म झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (14 ऑगस्ट) भारताच्या फाळणीदरम्यान अमानुष दुःख्ख आणि वेदना सोसणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, आजचा दिवस अशा लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी फाळणीचे चटके सोसून पुन्हा आपल्या जीवनाला नव्याने प्रारंभ केला. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताची फाळणी केली होती. यानंतर पाकिस्तानच्या रुपाने नव्या देशाचा जन्म झाला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त, आपण त्या लोकांचे स्मरण करत आहोत, जे फाळणीच्या भयावहतेने प्रभावित झाले आणि प्रचंड त्रास सहन केला. त्यांच्या धैर्याला श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे, ज्यांनी मानवाची सावरण्याची शक्ती दर्शवली. फाळणीमुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी आपल्या जीवनाची नव्याने सुरूवात केली आणि मोठे यशही मिळवले. आज आम्ही आपल्या देशातील एकता आणि बंधुतेचे सदैव रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार करतो.

अमित शाह यांनीही अर्पण केली श्रद्धांजली -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त फाळणीच्या झळा सोसलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, "आज फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त, त्या सर्वांना श्रद्धांजली, ज्यांनी इतिहासातील सर्वात क्रूर प्रकरणादरम्यान अमानुष यातनांचा सामना केला, जीव गमावला, आणि बेघर झाले. आपला इतिहास स्मरणात ठेवून आणि त्यातून काही बोध घेऊनच एक राष्ट्र आपले मजबूत भविष्य निर्माण करू शकते आणि एका शक्तिशाली देशाच्या रूपात समोर येऊ शकतो."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारत