शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

काँग्रेसने शेतकऱ्यांबद्दल बाता मारल्या, केले काहीही नाही; पाणी तंटे विकोपाला नेले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:08 IST

राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या वर्षपूर्तिनिमित्त आयोजिलेत समारंभात मोदी यांनी हे वक्तव्य केले.

जयपूर : काँग्रेस शेतकऱ्यांबद्दल मोठमोठ्या बाता मारते, पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी या पक्षाने काहीही केलेले नाही आणि तसेच ते दुसऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ देत नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. ते म्हणाले की, काँग्रेसने राज्या-राज्यांमधील जलविवाद सोडविण्याऐवजी ते अधिक विकोपाला नेले. 

राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या वर्षपूर्तिनिमित्त आयोजिलेत समारंभात मोदी यांनी हे वक्तव्य केले. त्या राज्यातील ऊर्जा, रस्ते, रेल्वे, जलसंपदा क्षेत्रातील २४ विकासप्रकल्पांपैकी काहींचा पायाभरणी, तर काही प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ मोदी यांच्या हस्ते पार पडला. ४६,३०० कोटी रुपये खर्चाचे हे सारे प्रकल्प आहेत. 

मोदी यावेळी म्हणाले की, काँग्रेसने राज्या-राज्यांमधील जलविवाद सोडविण्याऐवजी अधिक जटिल बनवले. मात्र, भाजपने राज्यांमध्ये सुसंवाद वाढावा. आमचा संघर्षापेक्षा सहकार्यावर विश्वास आहे. भाजपने विरोधासाठी विरोध कधीच केला नाही. आम्हाला अनेक प्रश्नांवर तोडगे काढायचे आहेत. प्रश्न न सोडविता त्यांचे भिजत घोंगडे ठेवण्यात भाजपला स्वारस्य नाही. त्यामुळे आम्ही इआरसीपी प्रकल्पाला मंजुरी दिलीच, शिवाय त्या प्रकल्पाचा विस्तारही केला, असे माेदी म्हणाले.  

‘नर्मदा प्रकल्पातही काँग्रेसचा खो घालायचा प्रयत्न’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नर्मदेचे पाणी गुजरातमधील विविध भागांत पोहोचावे यासाठी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी एक मोहीम राबविली होती. त्यावेळी त्या मोहिमेत खो घालण्याचे प्रयत्न काँग्रेस व काही स्वयंसेवी संस्थांनी केले, असाही आरोप पंतप्रधानांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी