शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

न्यायदानातील विलंब मोठे आव्हान: पंतप्रधान मोदी; न्याय प्रणालीत प्रादेशिक भाषांच्या वापरावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 5:55 AM

न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देशवासीयांसमोर असलेल्या प्रमुख आव्हानांपैकी एक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केवडिया (गुजरात): न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देशवासीयांसमोर असलेल्या प्रमुख आव्हानांपैकी एक असून, सक्षम राष्ट्र आणि एकजिनसी समाजासाठी संवेदनशील न्याय व्यवस्था गरजेची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. 

गुजरातमधील एकतानगर (केवडिया) येथे आयोजित विधी मंत्री व विधी सचिवांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ संदेश प्रसारित करण्यात आला, या संदेशात ते बोलत होते. कायदेशीर भाषा नागरिकांसाठी अडथळा बनू नये, असे नमूद करत ते म्हणाले की, ‘न्याय सुलभता’ आणण्यासाठी नवीन कायदे सुस्पष्टपणे आणि प्रादेशिक भाषांमध्ये लिहावेत जेणेकरून गरिबांनाही ते सहज समजू शकतील. (वृत्तसंस्था)

आठ वर्षांत १५०० जुन्या कायद्यांना मूठमाती, प्रादेशिक भाषांच्या वापरावर जोर, ई-कोर्टस् मिशन गती घेतेय. व्हर्च्युअल सुनावणी व आरोपी, साक्षीदारांची न्यायालयासमोर व्हर्च्युअल हजेरी यासारख्या प्रणाली आज न्याय व्यवस्थेचा भाग बनल्या आहेत. ५ जीमुळे अशा प्रणालींना चालना मिळण्यासह अनेक बदल अंतर्निहित आहेत, असे मोदी म्हणाले. 

गेल्या आठ वर्षांत आपल्या सरकारने दीड हजारांहून अधिक असंबद्ध, अप्रचलित व जुने कायदे रद्द केले. ब्रिटिश राजवटीपासूनचे अनेक कायदे आजही अनेक राज्यांत लागू आहेत. त्यांनी ते काढून नवीन कायदे तयार करावेत, असे मोदी म्हणाले. न्याय सुलभतेसाठी प्रादेशिक भाषांची भूमिका मोठी आहे. कायदा बनवताना, गरिबांनाही तो समजू शकेल याकडे आमचे लक्ष असले पाहिजे, असे ते म्हणाले. एवढेच नाही तर काही देशांत कायदा तयार करतानाच तो कधीपर्यंत अस्तित्वात राहील हे देखील ठरविले जाते. भारतातही हीच पद्धत स्वीकारावी लागेल, असे मोदी म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार