शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

PM Modi Speech: 'काँग्रेसने 90 वेळा तर एकट्या इंदिरा गांधींनी 50 वेळा निवडून आलेले सरकार पाडले'- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:40 IST

PM Modi Speech : यावेळी पीएम मोदींनी शरद पवारांचेही सरकार काँग्रेसने पाडल्याचा उल्लेख केला.

PM Modi in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (9 फेब्रुवारी) संसदेत पुन्हा एकदा काँग्रेसवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, विरोधक आमच्यावर राज्य सरकारांना त्रास देत असल्याचा आरोप करतात, पण उलट काँग्रेसने सर्वाधिक राज्य सरकारे पाडली आहेत.

काँग्रेसने कलम 356 चा गैरवापर केलाराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसला घटनेच्या कलम 356 चा सर्वाधिक गैरवापर केल्याची आठवण दिली. ईडी आणि सीबीआयच्या मदतीने केंद्र सरकार बिगर-भाजपशासित राज्यांच्या सरकारांना त्रास देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर मोदी म्हणाले, 'आमच्यावर राज्य सरकारला अडचणीत आणल्याचा आरोप केला जातो, पण इतिहास पहा आणि कोणत्या पक्षाने कलम 356 चा सर्वाधिक गैरवापर केला ते पहा. काँग्रेसने एकूण 90 वेळा निवडून आलेली सरकारे पाडली. यापैकी फक्त इंदिरा गांधींनी कलम 356 चा 50 वेळा वापर केला.

शरद पवारांचेही सरकार पाडलेमोदी पुढे म्हणाले, केरळमध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार निवडून आले, जे पंडित नेहरूंना आवडले नाही आणि त्यांनी सरकार पाडले. तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांचे सरकारही बरखास्त करण्यात आले होते. शरद पवार यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी शरद पवारांचा खूप आदर करतो. 1980 मध्ये त्यांचेही सरकार पाडण्यात आले. काँग्रेसने प्रत्येक प्रादेशिक नेत्याला त्रास दिला. ही काँग्रेसच्या राजकारणाची पातळी आहे, अशी टीका त्यांनी केली.

हे विज्ञान आणि तंत्रज्ञानविरोधी लोकपंतप्रधान पुढे म्हणाले, काँग्रेस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचेही विरोधक आहेत. त्यांनी आपल्या वैज्ञानिकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना देशाची चिंता नाही, त्यांना त्यांच्या राजकीय चढ-उतारांची चिंता आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये आज देश जागतिक आघाडीवर आहे. डिजिटल इंडियाच्या यशाने आज जगभरात भारताचे नाव उचांवले आहे, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस