शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

Pm Modi vs Arvind Kejriwal: "गुजरात तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल"; पंतप्रधान मोदींची AAP वर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 18:31 IST

गुजरातमध्ये सध्या शहरी नक्षलवादी घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचाही लगावला टोला

Pm Modi vs Arvind Kejriwal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरात दौऱ्यावर, आम आदमी पक्षावर आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. नरेंद्र मोदी यांनी आपच्या नेतेमंडळींना 'शहरी नक्षलवादी' असे संबोधले. शहरी नक्षलवादी त्यांचे स्वरूप बदलून गुजरातमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु राज्य त्यांना उद्ध्वस्त करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. गुजरातमधील भरूच जिल्ह्यात देशातील पहिल्या बल्क ड्रग पार्कच्या पायाभरणीनंतर पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करत होते. मोदी यावेळी असेही म्हणाले की, शहरी नक्षलवादी नवीन रूपात राज्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपला पोशाख बदलला आहे. ते आपल्या भोळ्या आणि उत्साही तरुणांची दिशाभूल करत आहेत.

'गुजरात अशा लोकांना उद्ध्वस्त करून टाकेल'

पंतप्रधान मोदी आज सभेत म्हणाले, "शहरी नक्षलवादी राज्यात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी धडपड करत आहेत. त्याचे विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही त्यांना आमची तरुण पिढी नासवू देणार नाही. आपण आपल्या मुलांना 'शहरी नक्षलवाद्यां'पासून सावध केले पाहिजे. या लोकांनी (शहरी नक्षलवाद्यांनी) देश उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. ते परकीय शक्तींचे एजंट बनून काम करत आहेत. पण मला विश्वास आहे की त्यांच्यापुढे गुजरात झुकणार नाही, उलट गुजरातची जनता त्यांचाच नाश करेल आणि त्यांचे मनसुबे उधळून लावेल."

गुजरातमध्ये सुरू आहे AAP ची मोर्चेबांधणी

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपशासित राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांनी सरदार सरोवर धरण प्रकल्प रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, अशी आठवण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जनतेला करून दिली. शहरी नक्षलवादी आणि राजकीय पाठबळ असलेल्या विकासविरोधी घटकांनी गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाचे बांधकाम रोखले होते. अनेक वर्षे मोहीम राबवून पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे सांगून त्यांनी त्याचे बांधकाम थांबवले, असा आरोपही पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात केला होता.

नक्षलवादावर काय म्हणाले PM मोदी?

"मला माझ्या आदिवासी बांधवांना विशेष सांगितले पाहिजे की, नक्षलवाद हा (पश्चिम) बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये तसेच ओडिशा, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सुरूवातीच्या टप्प्यात प्रयत्नशील आहे. हे नक्षलवादी आमच्या आदिवासी तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. अशा वेळी राज्यातील आदिवासी लोकांनी माझे म्हणणे ऐकून माझ्यावर विश्वास ठेवला आहे, असे मी समाधानाने सांगू शकतो," असे पंतप्रधान मोदी विश्वासाने म्हणाले.

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप